शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

सिटीझन सायन्स सेंटर

आज आपण जगाच्या इतिहासाच्या अशा टप्प्यात जगात आहोत, जिथे दैनंदिन जीवनात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सर्वाधिक फायदे माणूस मिळवत आहे. विज्ञान- तंत्रज्ञान निर्मितीचा वापर प्राचीन काळापासून माणूस आपल्या फायद्यासाठी करत आला असला, तरी आजच्या इतकी वैविध्यता, विस्तार आणि निर्मितीचा वेग पूर्वी कधी नव्हता आणि तो सतत वाढतही आहे. याला कारणीभूत ठरली ती आजची सुसंघटीत संस्थात्मक व्यवस्था. पूर्वी शोध शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक कल्पनाशक्तीच्या आणि त्याने निर्माण केलेल्या उपकरणांच्या जोरावर लागत असत. एखाद्या संशोधनाची व्याप्ती, त्यासाठी येणारा खर्च आणि सुरक्षेसारखी इतर कारणे लक्षात घेता पुढे अशा प्रकारच्या व्यक्तिगत संशोधनाला मर्यादा आल्या आणि विज्ञान संशोधन संस्थांचा विकास झाला. खर्चाच्या आणि सुरक्षेच्या कारणाने बहुसंख्य संशोधन संस्था सरकारी अधिपत्याखाली आल्या किंवा सरकारच्या पुढाकारानेच उभारल्या गेल्या. या गोष्टीचा विज्ञानाला फायदा नक्कीच झाला. मात्र तोटाही झाला. विज्ञानाचे सरकारीकरण झाले आणि आणि औपचारिकतेने विज्ञानाला ग्रासले. विज्ञानाची निर्मिती ही फक्त विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या पदवीधरांकडून संशोधन संस्थांमध्येच होऊ शकते असा समज रूढ झाला आणि सर्वसामान्य माणूस (समाजातला बहुसंख्य वर्ग) विज्ञान निर्मितीपासून सतत दूर राहिला.
वैज्ञानिक शोधांची निर्मितीच मुळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणाऱ्या प्रश्नांतून होत असते. संशोधन संस्था त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक असणारी साधन- सामग्री पुरवतात, तर विज्ञानाचे औपचारिक शिक्षण त्या व्यक्तीला आतापर्यंतच्या विज्ञानाच्या विकासाची पार्श्वभूमी उपलब्ध करून देते. मात्र, वैज्ञानिक शोधांसाठी मूलभूत निकष साधन सामग्रीची उपलब्धता आणि औपचारिक शिक्षण हा नसून व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी केली जाणारी धडपड हा आहे. भारताचा विचार केल्यास नेमकी याच गोष्टीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. दुसऱ्या चांगल्या आर्थिक पर्यायांमुळे असेल, विज्ञानाविषयीच्या पारंपरिक समजांमुळे असेल किंवा काही घरगुती कारणांमुळे असेल, कल्पकता अंगी असूनही विद्यार्थी विज्ञानाला करिअर म्हणून निवडत नाहीत आणि संशोधन संस्थांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाकडे कल्पकता असतेच असे नाही. परिणामी विज्ञान निर्मितीची क्षमता असणारा एक मोठा वर्ग कायम औपचारिकतेमुळे विज्ञानापासून दूर राहतो आणि नुकसान विज्ञानाचे होते.
संशोधन संस्थांना त्यांना अपेक्षित असलेले उमेदवार कधी मिळतील हे सांगणे कठीण आहे. मात्र समाजात विज्ञानाची मनापासून आवड असणारा, आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड करणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. त्याचे वय दहा वर्षापासून सत्तर- ऐंशी वर्षेही असू शकेल. त्याने विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेले असेलच असे नाही. त्यातील एखाद्याचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले असेल, एखाद्याकडे अशी नाविन्यपूर्ण कल्पना असेल, की जिच्या आधारे समाजातील एखाद्या गंभीर समस्येवर उपाय मिळू शकेल, एखाद्याची चिकाटी निसर्गातील अज्ञात तत्वही उलगडू शकेल. अशा वर्गाला केवळ औपचारिकतेच्या नावाखाली विज्ञानापासून दूर ठेवणे भारताला आणि विज्ञानाला परवडणार आहे का?
सुमारे बारा वर्षांच्या विज्ञान क्षेत्रातील अनुभवातून आणि दोन वर्षांच्या प्रत्यक्ष तयारीनंतर विज्ञानाला औपचारिकतेतून बाहेर काढून समाजाशी एकरूप करण्यासाठी आम्ही 'सिटीझन सायन्स मूव्हमेंट  ' सुरु करीत आहोत. 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' या सूत्राने ही चळवळ काम करणार आहे. ही कल्पना तशी नवी नाही. जगात अनेक ठिकाणी नागरी सहभागातून वैज्ञानिक अभियान राबवले जात आहेत. भारतातही विविध सर्वेक्षण आणि निरीक्षणांमध्ये सिटीझन साईंटिस्ट सहभागी होत असतात. मात्र, पुण्यात देशातील पाहिले सिटीझन सायन्स सेंटर सुरु करून सिटीझन साईंटिस्टच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पुण्यातील दहापेक्षा अधिक संशोधन संथांची मदत घेतली जात आहे. हे सेंटर नागरिक आणि संशोधन संस्थांमधील दुवा म्हणूनही कार्य करेल. संशोधन संस्थांना ज्या ठिकाणी नागरी सहभागाची गरज लागेल (निसर्ग, पर्यावरण, आरोग्य सर्वेक्षणे इ.), त्या ठिकाणी या सेंटरच्या माध्यमातून संशोधन संस्थांना सहकार्य करण्यात येईल, तर नागरिकांच्या कल्पनेतून उतरलेल्या संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन आणि प्रयोगाच्या सुविधा संशोधन संस्थांकडून पुरवण्यात येतील. विविध शहरी, पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवरही विज्ञानाच्या आधारे तोडगा काढण्यासाठी हे केंद्र काम करेल. नागरिकांमधून उच्च दर्जाचे विज्ञान संशोधन घडावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा हा या उपक्रमाचा अंतिम हेतू आहे.
'सिटीझन साईंटिस्ट' हे कोणीही असू शकतील. आयटी प्रोफेशनल, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, राजकारणी, कलाकार, गृहिणी, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी.. अगदी कोणीही. यात सहभागी होण्यासाठी आवश्यक निकष आहे- 'विज्ञानाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती'. सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडत्या विषयाचा शास्त्रीय अभ्यास आणि संशोधन करू शकतील. त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, प्रयोगासाठीच्या सुविधा, जर्नल्स, लायब्ररी सेन्टरच्या माध्यमातून पुरवण्यात येतील (अर्थात सेन्टरच्या स्वतःच्या सुविधा टप्प्या- टप्प्याने निर्माण करण्यात येतील). सिटीझन साईंटिस्टकडून पूर्ण होणारे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जर्नलही सुरु करण्यात येणार आहे. जे देशभरातील शिक्षण संस्था, शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांमध्ये वितरीत करण्यात येईल. सिटीझन साईंटिस्ट हे निरनिराळ्या पार्श्वभूमीतून येणार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची समान पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी वर्षभर वैज्ञानिक व्याख्याने, सायन्स फिल्म क्लब, विविध विषयांच्या कार्यशाळा, संस्था भेटी, सर्वेक्षणे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बीएस्सी, एमएस्सी, बीईच्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून करता येतील. सिटीझन साईंटिस्टकडे स्वतःचा ठोस प्रकल्प नसल्यास सिटीझन सायन्स सेन्टरच्या पुढाकाराने सुरु झालेल्या 'प्रोजेक्ट मेघदूत', लाईट पोल्युशन मैपिंग, लोणार कन्झर्वेशन सारख्या प्रकल्पांत सहभागी होता येईल. पुण्यातील संशोधन संस्थांना त्यांच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमामधेही सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडीप्रमाणे सहकार्य करू शकतील. सहभाग घेऊ शकतील.


विज्ञान संशोधनाला संशोधन संस्थांच्या भिंतीआडून थेट समाजामध्ये रुजवण्याच्या प्रयत्नाला पुणेकर नक्की स्वीकारतील याचा आम्हाला विश्वास आहे. माणसाला आपल्या पारंपरिक समजामधून मुक्त करून वास्तव दाखवण्याचे काम विज्ञान करीत असते. यातूनच माणूस उत्तरोत्तर समृद्ध होत जातो. सिटीझन सायन्स मूव्हमेंटच्या माध्यमातून भक्कम तटबंदीच्या आड औपचारिकतेमध्ये अडकलेल्या विज्ञान संशोधनाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भारतातील विज्ञान काही अंशी तरी समृद्ध होईल याची खात्री वाटते. आपणही या मूव्हमेंटमध्ये सहभागी व्हा. आपल्या एकत्रित प्रयत्नातूनच 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' साध्य होऊ शकेल !



तुमची खंत.. उत्तर तुमच्याकडेच!





सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्या एकविसाव्या शतकात भारत महासत्ता बनणार अशा भूलथापांना बळी पडणाऱ्यांना एकदम जमिनीवर आणणाऱ्या आहेत.




बातमी एक: ११ सप्टेंबर, २०१२ 
विज्ञानाभिमुखता आणि विज्ञान साक्षरतेच्या बाबतीत भारतअन्य देशांपेक्षा खूप मागे असल्याचे फ्रान्स येथे चालूअसलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय शास्त्रज्ञांनीच जगाच्या यानिदर्शनास आणून दिले आहे समाजालाविज्ञानाभिमुख करण्यासाठी चीनसारख्या देशांत जसे प्रयत्न होत आहेत तसे भारतात होत नाहीत असे मतशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे विशेष म्हणजे १९७० आणि ८०च्या दशकांत ज्या प्रमाणावर प्रयत्न झाले तेप्रमाणही आता कमी झाले आहे आणि धार्मिकतेचे वाढले आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे    
बातमी दोन: २७ सप्टेंबर, २०१२ 
विज्ञानाच्या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर ठसा उमटवू शकलेला नाही अशी खंत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सत्तराव्या स्थापनादिनी व्यक्त केली. मात्र वैज्ञानिकांनी निराश न होता मोठी स्वप्ने बघावीत असे आवाहनही त्यांनी केले. 
आधुनिक जगातील विकासामुळे तयार झालेली गुंतागुंत हाताळण्यात पारंपरिक शास्त्रशाखा आणि दृष्टिकोन तोकडे पडत आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भाषण सीएसआयआरच्या देशभरातील ३७ केंद्रांमध्ये इंटरनेटमार्फत पोहोचले.

विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्याच नाही, तर देशाविषयी प्रेम वाटणाऱ्या कोणालाही या बातम्या वाचून दुःख व्हावे. एकीकडे विकासदराचे, उंचावणाऱ्या जीवनमानाचे दाखले देणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणात देशाच्या विज्ञानातील प्रगतीविषयी चिंता व्यक्त व्हावी यात आता तसे नवे काही नाही. यंदा राष्ट्रीय विज्ञान दिनी 'सायन्स' या प्रख्यात नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारत विज्ञान क्षेत्रात चीनच्या खूप मागे असल्याचे मत नोंदवले होते. २००५ पासून सलग आठ वर्षे 'सायन्स काँग्रेस'च्या उद्घाटन प्रसंगी ते अशाच आशयाचे भाषण नियमितपणे वाचत आले आहेत. त्याचवेळी विज्ञान संशोधनासाठी जीडीपीच्या दोन टक्के तरतूद करण्यासाठी आमचे सरकार बांधील आहे (फक्त बांधील आहे.. तसे अजून काही झालेले नाही) हेही त्याला जोडून सांगत आले आहेत. 

येत्या जानेवारीमध्ये कोलकात्यामध्ये शंभरावी सायन्स काँग्रेस होत आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा दर वर्षाच्या सुरवातीला आढावा घेणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान करतात असा प्रघात आहे. देशातील मान्यवर शास्त्रज्ञ या परिषदेचे अध्यक्ष असतात. यंदा मात्र स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या परिषदेचे अध्यक्ष आहेत. १९४८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा असाच बहुमान मिळाला होता. सायन्स काँग्रेसच्या वाटचालीला १०० वर्षे पूर्ण होत असताना डॉ. मनमोहन सिंग यांनाही हाच बहुमान मिळाला आहे. 

देशाच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल वास्तववादी विचार मांडल्याबद्दल खरतर पंतप्रधानांचे अभिनंदन करायला हवे. मात्र, तसे करणे साफ चुकीचे ठरेल.. याचे मुख्य कारण देशाच्या विज्ञान क्षेत्राच्या अशा अवस्थेबद्दल सध्याच्या सरकारचे प्रमुख म्हणून त्यांची सर्वाधिक जबाबदारी आहे.

पंडित नेहरू यांना विज्ञान परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, याला स्वातंत्र्यानंतरची पाहिली सायन्स कॉंग्रेस म्हणून महत्व होतेच, मात्र स्वतंत्र भारताची जडण- घडण विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारावर व्हावी हे त्यांचे त्या मागील विचार आणि त्याला धरून त्याकाळी त्यांनी उचललेली पावले अधिक कारणीभूत होती. देशाच्या आतापर्यंतच्या वैज्ञानिक विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या सीएसआयआर, अणुऊर्जा आयोग, आयआयटी, इंकोस्पार (आजची इस्रो), डीआरडीओ आदी संस्थांची पायाभरणी नेहरूंच्या काळात झाली आणि त्या संस्थांच्या मागे ते स्वतः भक्कमपणे उभे राहिले. डॉ. मनमोहन सिंग यांना अध्यक्ष करताना आजच्या भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांच्यात आणि नेहरुंमध्ये साम्य हेरताना डॉ. सिंग यांनी विज्ञान तंत्रज्ञानासाठी वाढवलेल्या आर्थिक तरतुदीचा हवाला दिला आहे. (अनेक शास्त्रज्ञांच्या मते सायन्स काँग्रेसचा शंभर हा आकडा खरतर डॉ. सिंग यांना अध्यक्ष बनवण्यासाठी कारणीभूत आहे)

ज्या 'सायन्स' या अमेरिकन जर्नलला पंतप्रधानांनी मुलाखत दिली होती, त्याच 'सायन्स'चे संपादक प्रा. ब्रूस अल्बर्टस यांची त्याच्या थोडे आधी मी पुण्यात मुलाखत घेतली होती. भारताच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीवर आणि आव्हानांवर त्यावेळी ते बरेच बोलले. त्या मुलाखतीत त्यांनी नेहरूंच्या संसदेतील भाषणांचा हवाला देताना 'वैज्ञानिक दृष्टीकोन' भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी कसा उपयुक्त ठरेल हे सांगितले. देशाच्या नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीला लागला तर स्वाभाविकपणे तो लॉजिकल विचार करू लागेल. अगदी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या सर्व उमेदवारांना नागरिक वस्तूनिष्ठपणे तपासून घेतील आणि मगच मत देतील. त्यातून अधिक योग्य उमेदवार निवडून येतील, त्यातून लोकशाही बळकट होत जाईलच पण देशाचा विकासही साधेल. भारताला नेहरूंच्या त्या भाषणाचा विसर पडला असल्याची खंत प्रा. अल्बर्टस यांनी व्यक्त केली. वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी अगदी प्राथमिक शिक्षणापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांद्वारेही सर्वसामन्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे त्यांनी मुलाखतीत नमूद केले.

सायन्स कॉंग्रेसच्या शताब्दी वर्षात घडलेल्या काही घटनांनी प्रा. ब्रूस अल्बर्टस यांच्या मुलाखतीतील विविध मुद्द्यांचे महत्व सतत जाणवत गेले.   
- पुण्यात पत्रिकेतील दोषामुळे एका सुशिक्षित (?) नागरिकाने आपल्या सगळ्या कुटुंबाला संपवले. 
- पुण्यात आघारकर संशोधन संस्थेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अनिल काकोडकरांना जैतापूरविषयी भाषण देण्यापासून रोखले.
- स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कुडनकोलमचे काम बंद.
- उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये पुन्हा जातीची समीकरणे महत्वाची ठरली.
- 'फोरजी स्कॅम'मुळे इस्रोच्या माजी अध्यक्षांना सरकारी पदांवर कायमस्वरूपी बंदी.

लोकांचे दैनंदिन जीवन असो, देशाच्या विकासासाठी उचलण्यात येणारी पावले असोत, किंवा राजकारण.. विज्ञान निरक्षरतेचे परिणाम सगळीकडे ठळकपणे दिसून येत आहेत.
देशाच्या उर्जेची समस्या सोडवण्यासाठी आपण लाख अणुभट्ट्या उभारू पण त्यांचे कार्य, त्या मागील विज्ञान, त्यांचे महत्व सर्वसामान्यांना माहित नसेल तर काय? जैतापूर आणि कुडनकुलमवरून दिसत आहेच. दूरसंचारक्रांती आणि त्यातून देशाचा विकास साधण्यासाठी आपण लाख उपग्रह अवकाशात सोडू.. पण त्यांच्या आधारे दिसणाऱ्या टीव्हीवर लोक सर्वाधिक काय पाहतात? (किंवा दाखवले काय जाते) राशीभविष्य आणि त्यावरील उपाय. 'आयसर'सारख्या विज्ञानाच्या अत्याधुनिक संस्थांमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली जाते. मग असेच आयसर असणाऱ्या पुण्यात सुशिक्षित म्हणवले जाणारे कुटुंब पत्रिकेत मंगळ असल्यामुळे संपवले कसे जाऊ शकते?

वैज्ञानिक दृष्टीकोन घरातील संस्कारातून निर्माण व्हावा अशी स्थिती भारतात तरी नक्कीच नाही. शाळेमधेच काही होऊ शकले तर. आणि शाळेतील शिक्षणाकडे पहिले, तर आज दिसणाऱ्या या सगळ्या प्रश्नांचे मूळ आपल्याला तिथेच सापडेल.            

सध्या आम्ही गोव्याच्या ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विज्ञानाचे कार्यक्रम घेत आहोत. दहा शाळांपैकी नऊ शाळांमध्ये आठवी- नववीच्या विद्यार्थ्यांना अणु म्हणजे काय? त्याची रचना कशी असते, किंवा सूर्यमालेतील ग्रह किती आणि त्यांचा क्रम काय हे सांगता आले नाही. एका शाळेतील मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'तरीही हे सगळे पास होणार. त्यांना पास कसे व्हायचे हे माहित आहे.' मनात विचार आला, मुले विज्ञानात पास झाली, तरी अणुची रचनाच माहित नसेल, तर त्याच्या शक्तीविषयी पुढे गैरसमज होणे स्वाभाविक नाही का? सूर्यमालेतील ग्रहांची माहितीच नसेल, तर ते मानवावर परिणाम करू शकतात या अंधश्रद्धेला बळी का नाही पडणार? शाळेच्या पुस्तकातील या साध्या आणि मूलभूत संकल्पना पुढे जाऊन याच मुलांच्या आयुष्यावर (आणि परिणामी देशाच्या प्रगतीवर) दूरगामी परिणाम करणार आहेत हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही?
माझा मित्र दिनेश निसंग हा संडे सायन्स स्कूल या नावाने शहरातील मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोगांचा उपक्रम राबवतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, 'या बाबतीत शहरातही फारशी चांगली स्थिती नाही. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनाच स्पष्ट नाहीत. त्या स्पष्ट व्हाव्यात यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि लेखी परीक्षेसाठी तयारी करून घेणे हे एकमेव उद्दिष्ट. मुले नुसती पास होत नाहीत, तर उत्तम मार्क मिळवतात. पण 'संकल्पना'.. बहुतेकांना समजलेल्याच नसतात.'

मग सरकारला या गोष्टी लक्षात येत नाहीत का? येत कशा नाहीत.. त्यासाठीच त्यांनी विज्ञान- तंत्रज्ञानासाठी अभूतपूर्व आर्थिक मदतीचा ओघ सुरु केला आहे. आयसर या संस्थेच्या एका शाखेला (देशात अशा पाच आयसर आहेत) पहिल्या पाच वर्षांसाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. आयआयटी, एनआयटीची संख्या वाढवली आहे, त्यांच्याही आर्थिक मदतीत मोठी वाढ केली आहे. शालेय स्तरातून वैज्ञानिक प्रतिभा शोधण्यासाठी 'इन्स्पायर'सारखी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. देशातील प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यंना विज्ञान प्रकल्पांसाठी पाच हजार रुपये रोख, त्यानंतर त्या प्रकल्पांचे प्रदर्शन मांडण्यासाठी विभाग स्तरावर दहा- दहा लाख रुपये.. थोडक्यात सरकारने विज्ञान शिक्षणावर कित्येक अब्ज रुपये खर्च करण्यास सुरुवात केली आहे. आणि शास्त्रज्ञ घडवण्याची आपली जबाबदारी पार पडली आहे....

सरकार जर विज्ञानासाठी एवढे करत असेल तर मग पंतप्रधानांना देशातील विज्ञानाच्या बाबतीत सतत नकारार्थी विधाने का करावी लागतात? 

परत इथे प्रश्न येतो 'लॉजिकल थिंकिंग'चा. सरकारचे सगळे प्रयत्न हे महाविद्यालयीन स्तराचे आहेत. त्यामुळे देशातील मोजक्याच विद्यार्थ्यांना (ज्यांना शालेय शिक्षण उच्च दर्जाचे मिळते) या शिक्षणाचा लाभ घेता येतो. यातील बहुतेक असे विद्यार्थी असतात, जे सरकारी मदतीशिवायही शास्त्रज्ञ होऊ शकतात. विज्ञानाच्या संकल्पना ज्यांच्या पक्क्या आहेत, अशांनाच या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो आणि अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. इतर ९९ टक्के विद्यार्थ्यांचे काय? 

त्यांना शास्त्रज्ञ बनवायचे राहूद्यात पण किमान शालेय स्तरावर त्यांना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झाल्या, तर भविष्यात देशात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर निर्माण होऊ शकणाऱ्या अनेक प्रश्नांवर आधीच तोडगा निघू शकेल. या संकल्पना शिकताना त्यांच्या मध्ये निर्माण होणारी चिकित्सक वृत्तीच देशाची लोकशाही बळकट करण्यास महत्वाची भूमिका निभावू शकते.

देशात अजूनही बहुतेक शाळांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत. 'शिक्षक' या संकल्पनेचीच नवी व्याख्या करायला हवी अशी अवस्था आहे. जे उद्याच्या शास्त्रज्ञांचा पाया पक्का करणार आहेत, त्यांचा पाया आधी पक्का आहे का? परीक्षाकेन्द्री अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवत आहे. त्यातून ज्ञान मिळवण्याचे काय? प्रज्ञा शोधाच्या नावाखाली अब्जावधी रुपये विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांवर उधळणाऱ्या सरकारने त्याच्या निम्मा खर्च करून त्याच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शाळेला प्रयोगशाळा उभ्या करून दिल्या, त्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रकारे प्रशिक्षित केले, शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली, तर आयसर, आयआयटीसारख्या संस्थांमध्ये उर्वरित ९९ टक्के विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व दिसू शकेल.

वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झालेले हे विद्यार्थी फक्त शास्त्रज्ञच बनतील असे नाही. त्यांच्यापैकी काही जण शिक्षक होतील, जे पुन्हा नव्याने संकल्पना स्पष्ट असणारे विद्यार्थी घडवतील. काही जण माध्यमांमध्ये जातील, जे सध्या माध्यमांमधून सुरु असणारा अंधश्रद्धेचा प्रसार रोखतील. काही जण राजकारणात जातील, जे देशाच्या विकासासाठी विज्ञान- तंत्रज्ञानाच्या आधारे धोरणे आखतील. काही जण प्रशासनात जातील, जे त्या धोरणांची वस्तुनिष्ठपणे अंमलबजावणी करतील. काही जण साहित्यिक होतील, जे विज्ञान साहित्य निर्माण करून सर्वसामान्यांना विज्ञानाकडे आकर्षित करतील. आणि अगदीच काही नाही, तरी जबाबदार नागरिक नक्की बनतील, जे सारासार विचार करून सुयोग्य उमेदवाराला निवडून देऊन देशाचे हित साधतील.

येत्या सायन्स काँग्रेसपासून पुढील दहा वर्षे सरकारने उच्च शिक्षणाबरोबर प्राथमिक विज्ञान शिक्षणावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिक प्रयत्न केले, तर तेव्हाच्या पंतप्रधानांना विज्ञानाबाबतची खंत व्यक्त करावी लागणार नाही.

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

दुष्काळाचे नियंत्रक


AmJ_ZmnmgyZ gw_mao _{hZm^a XS>r _maë`mda _mÝgyZ _hmamï´>mgh XoemÀ`m ~hþVm§e ^mJmV gH«$s` Pmbm Amho. nO©Ý`_mZmMo AmH$S>o hiyhiy gwYmaV AmhoV. _mÌ, Eb {ZZmogma»`m KQ>H$mMo gmdQ> `§XmÀ`m _mÝgyZda AÚmnhr Amho. Ë`m_wio 2002 Am{U 2009 à_mUo `§XmMo df©hr XþîH$mir R>aVo H$s H$m` Aer eŠ`Vm hdm_mZVÁkm§H$Sy>Z ì`º$ hmoV Amho. Joë`m dfu h§Jm_mVrb gamgarÀ`m 102 Q>¸o$ nmD$g XoUmam _mÝgyZ `§Xm _mÌ, {ZamimM amJ AmidVmZm {XgV Amho. Ë`m_mJo g_wÐ Am{U hdm_mZmVrb AZoH$ KQ>H$ H$maUr^yV AmhoV. `mVrb H$mhr KQ>H$m§da ZOa Q>mH$ë`mg _mÝgyZ hr {H$Vr pŠbï> KQ>Zm Amho Am{U Ë`m_wio {VMm AMyH A§XmO dV©dUo {H$Vr H$R>rU Amho ho ñnï> hmoVo.

_mÝgyZ_Yrb "~«oH$' Agm_mÝ` ZmhrV:
_mÝgyZZo g§nyU© ^maV ì`mnë`mda h§Jm_mV Ë`mMo à_mU gmaIo ZgVo. àXoemZwgma Am{U H$mbmdYrZwgma Ë`mV gVV MT> CVma `oV AgVmV. _mÌ, Xadfu _mÝgyZÀ`m h§Jm_mV EImXm AmR>dS>m Agm `oVmo Á`mdoir XoemÀ`m ~hþVm§e ^mJmVyZ nmD$g Jm`~ hmoVmo. `mbm H$maUr^yV R>aUmam _hÎdmMm KQ>H$ åhUOo _mÝgyZMm nyd©- npíM_ H$_r Xm~mMm nÅ>m (_mÝgyZ Q´>\$: `m Q´>\$À`m {R>H$mUr Z¡F$Ë` _mog_r dmao Z¡F$Ë`oH$Sy>Z dm`ì`oH$S>o diV AgVmV.). `m nQ²>Q>çmMr gm_mÝ` pñWVr n§Om~nmgyZ gwê$ hmoD$Z _Ü` ^maVm_YyZ ~§JmbMm CngmJa Aer AgVo. _mÝgyZ H$mimV H$mhr H$maUm§_wio hm nÅ>m Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrÀ`m X{jUobm qH$dm CÎmaobm gaH$V AgVmo. Am{U Vmo Á`m {Xeobm gaH$Vmo Ë`m ^mJmVrb nmdgmMo à_mU dmT>Vo. hm nÅ>m Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrnojm ~amM CÎmaobm åhUOo {h_mb`mÀ`m nm`Ï`mer nmoMbm H$s Ë`m ^mJmV Am{U B©emÝ` ^maVmVrb nmdgmMo à_mU dmT>Vo. _mÌ, `mdoir ~hþVm§e ^maVmVyZ nmD$g Jm`~ hmoVmo. _mÝgyZ Xoe^a nmoMë`mda V`ma hmoUmam hm _mÝgyZ Q´>\$ `§Xm 19 Owb¡n`ªV {h_mb`mÀ`m nm`Ï`mer Agë`mZo XoemÀ`m BVa ^mJmV nmdgmZo {dlm§Vr KoVbr hmoVr.
_mÝgyZ Q´>\$ à_mUoM dm`ì`oH$Sy>Z dmid§Q>mdê$Z `oUmè`m H$moaS>çm dmè`m§_wiohr _Ü` ^maVmVrb nmdgmda _moR>m n[aUm_ hmoVmo. `m H$moaS>çm dmè`m§_Yrb Yy{bH$U Am{U EAamogmob^modVr _Ü` ^maVmV O_m Pmbobo ~mîn O_m hmoD$ bmJë`mZo nmD$g XoUmè`m T>Jm§À`m {Z{_©Vr_Ü`o AS>Wim {Z_m©U hmoD$Z nmdgm_Ü`o I§S> nS>Vmo. `m dmè`m§Mm Omoa A{YH$ Agob, Va Z¡F$Ë` _mog_r dmè`m§Zmhr AS>Wim {Z_m©U hmoD$Z Ë`m_wiohr _mÝgyZ_Ü`o ~«oH$ nS>Vmo.
Eb {ZZmo qH$dm Eb {ZZmo gXZ© Am°pñgboeZ (EÝgmo):
gw_mao drg dfmªnmgyZ Eb {ZZmo Am{U _mÝgyZÀ`m g§~§Ym§da ~arM MMm© gwê$ Amho. E|erÀ`m XeH$mV ^maVr` hdm_mZemókm§Zr Eb {ZZmo gH«$s` AgVmZm Ë`mMm ^maVr` _mÝgyZda à{VHy$b n[aUm_ hmoV Agë`mMo XmIdyZ {Xbo. {dfwdd¥Îmr` nyd© àem§V _hmgmJamVrb g_wÐmÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ gamgarnojm gVV nmM _{hZo 0.5 A§e qH$dm Ë`mnojm A{YH$ am{hbo Va `m pñWVrbm Eb {ZZmo åhQ>bo OmVo. (X{jU A_o[aHo$Odirb àem§V _hmgmJamV hr KQ>Zm {¼g_gÀ`m Xaå`mZ hmoV Agë`m_wio `mMo ñn°{Ze ^mfoV "Eb {ZZmo' åhUOoM bhmZ _yb qH$dm {¼ñV ~mi Ago Zm_H$aU Pmbo.) `mM doir npíM_ àem§V _hmgmJamV Am{U qhXr _hmgmJamV OmñV Xm~mMo joÌ V`ma hmoVo. hdm_mZmÀ`m `m pñWVrbm hdm_mZemór` ^mfoV Eb {ZZmo gXZ© Am°pñgboeZ (EÝgmo) åhQ>bo OmVo. EÝgmoMr CîU pñWVr AgVmZm (Eb {ZZmo) ~hþVoH$doim Ë`mMm ^maVr` _mÝgyZda à{VHy$b n[aUm_ hmoVmo, Va EÝgmoMr W§S> pñWVr AgVmZm (bm {ZZm) Ë`mMm ^maVr` _mÝgyZda AZwHy$b n[aUm_ hmoVmo Ago {XgyZ Ambo Amho.
`§Xm {dfwdd¥Îmr` nyd© àem§V _hmgmJamÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ OyZÀ`m gwadmVrnmgyZ dmT>Ê`mg gwê$dmV Pmbr Amho. Ë`m_wio Eb {ZZmo nyU©nUo {dH${gV hmoÊ`mgmR>r Am°ŠQ>mo~a COmS>ob Ago hdm_mZemókm§Zm dmQ>Vo. åhUyZM `§Xm Ë`m pñWVrMm naVrÀ`m _mÝgyZda {dn[aV n[aUm_ hmoÊ`mMr eŠ`Vm dV©dÊ`mV Ambr Amho. _mÌ, XþgarH$S>o EH$ Aä`mg Agohr XmIdVmo H$s, Eb {ZZmo {dH${gV hmoV AgVmZmhr _mÝgyZda Ë`mMm à{VHy$b n[aUm_ hmoD$ eH$Vmo. 1918, 1951, 1965, 1972, 1982, 1987, 2002 `m dfu Ambobo XþîH$mi ho Eb {ZZmoÀ`m {dH${gV hmoÊ`mÀ`m à{H«$`oXaå`mZMo hmoVo. `§Xmhr VerM pñWVr amhÊ`mMr eŠ`Vm hdm_mZemók dV©dV AmhoV. Eb [ZZmo gH«$s` hmoV AgVmZm ^maVr` CnI§S>mXaå`mZ `§Xm {XgV AgUmar _hÎdmMr bjUo åhUOo H$_r Xm~mÀ`m joÌm§Mm A^md (h§Jm_mV ~§JmbÀ`m CngmJamV n{hbo H$_r Xm~mMo joÌ 21 Owb¡ amoOr {Z_m©U Pmbo Amho.). _mÝgyZ H$mimV gmYmaUnUo _{hÝ`mbm XmoZ A{VVrd« H$_r Xm~mMr joÌo Á`mbm {S>àoeZ åhUVmV, V`ma hmoUo Ano{jV AgVo. `§Xm _mÌ Aem joÌm§À`m A^mdm_wio gd©Xÿa Am{U OmoamMm nmD$g AZw^dm`bm {_imbobm Zmhr.
B§{S>`Z AmoeZ S>m`nmob (Am`AmoS>r):
gmYmaUnUo Eb {ZZmo à_mUoM hm KQ>H$hr _mÝgyZda n[aUm_ H$aVmo Ago {XgyZ Ambo Amho. qhXr _hmgmJamV ^maVmÀ`m nyd© Am{U npíM_ ^mJmVrb g_wÐmÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ gamgarnojm EH$mAmS> EH$ Ago H$_r A{YH$ amhV AgVo. Á`mdoir npíM_ {h§Xr _hmgmJamVrb g_wÐn¥ð>mMo Vmn_mZ gamgarnojm A{YH$ am{hb (nm{PQ>rìh Am`AmoS>r) Ë`mdoir ^maVmV Mm§Jbm nmD$g nS>Vmo, Va B§S>moZo{e`m Am°ñQ´>o{b`mV Ë`mÀ`m {dê$Õ pñWVr AgVo. Á`mdoir nyd© {h§Xr _hmgmJamVrb g_wÐn¥ð>mMo Vmn_mZ gamgarnojm A{YH$ AgVo ({ZJoQ>rìh Am`AmoS>r), Ë`mdoir ^maVmVrb _mÝgyZda Ë`mMm à{VHy$b n[aUm_ hmoVmo. 2009 gmbr Amboë`m XþîH$mimXaå`mZ Eb {ZZmo gH«$s` AgyZhr Am`AmoS>r nm°{PQ>rìh am{hë`m_wio CÎmamYm©V Mm§Jbm nmD$g Pmbm hmoVm. `§Xm AÚmnn`ªV Var Am`AmoS>rMr 2009 à_mUo _mÝgyZbm gmW bm^bobr Zmhr.  
{V~o{Q>`Z A±Q>rgm`ŠbmoZ:
{h_mb`mÀ`m {Z{_©Vr~amo~a ^maVr` CnI§S>mV _mÝgyZ gw_mao nmM H$moQ>r dfmªnmgyZ Xadfu Z MwH$Vm ^oQ> XoV Amho. `mbm H$maUr^yV AgUmam EH$ _hÎdmMm KQ>H$ åhUOo {V~oQ>darb A±Q>rgm`ŠbmoZ. Zmdmà_mUoM `m _Ü`o gm`ŠbmoZÀ`m åhUOoM MH«$sdmXimÀ`m {dê$Õ à{H«$`m KS>V AgVo. `m joÌmVyZ dmao ~mhoaÀ`m {XeoZo T>H$bbo OmV Agë`m_wio A±Q>rgm`ŠbmoZÀ`m à^md joÌmV n¥ð>^mJmdê$Z `oUmè`m ~mhoarb dmè`m§Zm àdoe {_iV Zmhr. {V~oQ>Mo nR>ma g_wÐgnmQ>rnmgyZ gmYmaUnUo nmM {H$bmo_rQ>a C§Mrda Amho. Ë`m C§MrÀ`mhr da dmVmdaUmV gw_mao VrZ {H$bmo_rQ>an`ªV {V~oQ>À`m A±Q>rgm`ŠbmoZMr ì`már Agë`m_wio `m A±Q>rgm`ŠbmoZÀ`m ê$nmZo EH$ Z¡g{J©H$ q^V _mÝgyZÀ`m h§Jm_mV {V~oQ>À`m nR>mamda gH«$s` AgVo. `m joÌm_wio CÎmaoH$Sy>Z Am{U npíM_oH$Sy>Z `oUmè`m W§S> Am{U H$moaS>çm dmè`m§Zm à{V~§Y Pmë`m_wio Z¡F$Ë` _mog_r dmao CnI§S>mV {dZm AS>Wim `oVmV Am{U gmo~V nmD$g AmUVmV. Oa {V~oQ>Mo A±Q>rgm`ŠbmoZ Ë`m OmJoda V`ma Pmbo ZgVo, Va ^maVmV _mÝgyZ ~agUo eŠ` Pmbo ZgVo.
{V~oQ>À`m A±Q>rgm`ŠbmoZMr gm_mÝ` pñWVrhr _hÎdnyU© AgVo. Á`mdoir ho A±Q>rgm`ŠbmoZ Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrda qH$dm Ë`mÀ`m npíM_obm Agob, Voìhm XoemV Mm§Jbm nmD$g hmoVmo Ago bjmV Ambo Amho. _mÌ, Á`mdoir ho A±Q>rgm`ŠbmoZ Ë`mÀ`m gm_mÝ` {ñWVrÀ`m WmoS>o nyd}bm Agob, Ë`mdoir npíM_oH$Sy>Z `oUmè`m dmè`m§Zm ^maVr` CnI§S>mV `oÊ`mgmR>r OmJm {_iVo Am{U Ë`mMm à{VHy$b n[aUm_ _mÝgyZ H$mimVrb nmdgmda hmoVmo. `§Xm h§Jm_ gwê$ Pmë`mnmgyZ `m A±Q>rgm`ŠbmoZMr pñWVr Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrÀ`m nyd}bm amhV Agë`mMo {XgyZ Ambo Amho. Ë`mMmhr n[aUm_ `m H$mimVrb nmdgmda Pmbm Agë`mMo hdm_mZemókm§Mo åhUUo Amho. {V~oQ>r`Z A±Q>rgm`ŠbmoZMr pñWVr Am{U Eb {ZZmo `m§Mmhr g§~§Y AYmoao{IV Pmbm Amho.
EAamogmob:
Z¡F$Ë` _mog_r dmao g_wÐmdê$Z `oVmZm ~mîn dmhÿZ AmUV AgVmV. ^yn¥ð>mda dmVmdaUmV AgUmè`m gyú_ Yw{bH$Um§da (EAamogmob) ho ~mîn ~gyZ _oKq~Xÿ V`ma hmoVmV, Ë`mVyZ T>Jm§Mr {Z{_©Vr hmoVo. H$_r Xm~mÀ`m joÌmVyZ qH$dm nd©Vm§Mm AmYma KoD$Z ho T>J dmVmdaUmV C§Mmda Jobo H$s Ë`mVyZ Xdq~Xÿ V`ma hmoD$Z nmD$g nS>Vmo. _mÌ, dmVmdaUmVrb EAamogmobMr g§»`m dmT>V Jobr Va CnbãY ~mînmMo {dKQ>Z hmoV OmD$Z àË`oH$ EAamogmobgmR>rÀ`m ~mînmMo à_mU H$_r hmoV OmVo. `m_wio _oKq~Xÿ V`ma hmoÊ`mÀ`m à{H«$`oV AS>Wim {Z_m©U hmoVmo. n[aUm_r nmD$g XoÊ`mè`m T>Jm§Mr {Z{_©Vr hmoV Zmhr. dmid§Q>mH$Sy>Z `oUmè`m Yy{bH$Um§À`m dmXim§_wio _Ü`, CÎma ^maVmVrb dmVmdaUmaV EAamogmobMo à_mU dmT>bo, Va Ë`mMm à{VHy$b n[aUm_ VoWrb nmdgmda hmoVmo. àXÿ{fV àXoe, VgoM O§Jbm§Zm bmJUmè`m dUì`m§_YyZ dmVmdaUmV {_giUmè`m A{V[aº$ EAamogmobMmhr n[aUm_ nmdgmda hmoD$ eH$Vmo, Ago Aä`mgmVyZ {ZînÞ Pmbo Amho.

- मयुरेश प्रभुणे 
म. टा. संवाद मधून साभार