शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

सिटीझन सायन्स सेंटर

आज आपण जगाच्या इतिहासाच्या अशा टप्प्यात जगात आहोत, जिथे दैनंदिन जीवनात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सर्वाधिक फायदे माणूस मिळवत आहे. विज्ञान- तंत्रज्ञान निर्मितीचा वापर प्राचीन काळापासून माणूस आपल्या फायद्यासाठी करत आला असला, तरी आजच्या इतकी वैविध्यता, विस्तार आणि निर्मितीचा वेग पूर्वी कधी नव्हता आणि तो सतत वाढतही आहे. याला कारणीभूत ठरली ती आजची सुसंघटीत संस्थात्मक व्यवस्था. पूर्वी शोध शास्त्रज्ञाच्या वैयक्तिक कल्पनाशक्तीच्या आणि त्याने निर्माण केलेल्या उपकरणांच्या जोरावर लागत असत. एखाद्या संशोधनाची व्याप्ती, त्यासाठी येणारा खर्च आणि सुरक्षेसारखी इतर कारणे लक्षात घेता पुढे अशा प्रकारच्या व्यक्तिगत संशोधनाला मर्यादा आल्या आणि विज्ञान संशोधन संस्थांचा विकास झाला. खर्चाच्या आणि सुरक्षेच्या कारणाने बहुसंख्य संशोधन संस्था सरकारी अधिपत्याखाली आल्या किंवा सरकारच्या पुढाकारानेच उभारल्या गेल्या. या गोष्टीचा विज्ञानाला फायदा नक्कीच झाला. मात्र तोटाही झाला. विज्ञानाचे सरकारीकरण झाले आणि आणि औपचारिकतेने विज्ञानाला ग्रासले. विज्ञानाची निर्मिती ही फक्त विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेल्या पदवीधरांकडून संशोधन संस्थांमध्येच होऊ शकते असा समज रूढ झाला आणि सर्वसामान्य माणूस (समाजातला बहुसंख्य वर्ग) विज्ञान निर्मितीपासून सतत दूर राहिला.
वैज्ञानिक शोधांची निर्मितीच मुळी एखाद्या व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणाऱ्या प्रश्नांतून होत असते. संशोधन संस्था त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक असणारी साधन- सामग्री पुरवतात, तर विज्ञानाचे औपचारिक शिक्षण त्या व्यक्तीला आतापर्यंतच्या विज्ञानाच्या विकासाची पार्श्वभूमी उपलब्ध करून देते. मात्र, वैज्ञानिक शोधांसाठी मूलभूत निकष साधन सामग्रीची उपलब्धता आणि औपचारिक शिक्षण हा नसून व्यक्तीच्या मनात येणाऱ्या कल्पना, तिला पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी केली जाणारी धडपड हा आहे. भारताचा विचार केल्यास नेमकी याच गोष्टीमध्ये विरोधाभास पाहायला मिळतो. दुसऱ्या चांगल्या आर्थिक पर्यायांमुळे असेल, विज्ञानाविषयीच्या पारंपरिक समजांमुळे असेल किंवा काही घरगुती कारणांमुळे असेल, कल्पकता अंगी असूनही विद्यार्थी विज्ञानाला करिअर म्हणून निवडत नाहीत आणि संशोधन संस्थांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाकडे कल्पकता असतेच असे नाही. परिणामी विज्ञान निर्मितीची क्षमता असणारा एक मोठा वर्ग कायम औपचारिकतेमुळे विज्ञानापासून दूर राहतो आणि नुकसान विज्ञानाचे होते.
संशोधन संस्थांना त्यांना अपेक्षित असलेले उमेदवार कधी मिळतील हे सांगणे कठीण आहे. मात्र समाजात विज्ञानाची मनापासून आवड असणारा, आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी धडपड करणारा मोठा वर्ग अस्तित्वात आहे. त्याचे वय दहा वर्षापासून सत्तर- ऐंशी वर्षेही असू शकेल. त्याने विज्ञानाचे औपचारिक शिक्षण घेतलेले असेलच असे नाही. त्यातील एखाद्याचे शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले असेल, एखाद्याकडे अशी नाविन्यपूर्ण कल्पना असेल, की जिच्या आधारे समाजातील एखाद्या गंभीर समस्येवर उपाय मिळू शकेल, एखाद्याची चिकाटी निसर्गातील अज्ञात तत्वही उलगडू शकेल. अशा वर्गाला केवळ औपचारिकतेच्या नावाखाली विज्ञानापासून दूर ठेवणे भारताला आणि विज्ञानाला परवडणार आहे का?
सुमारे बारा वर्षांच्या विज्ञान क्षेत्रातील अनुभवातून आणि दोन वर्षांच्या प्रत्यक्ष तयारीनंतर विज्ञानाला औपचारिकतेतून बाहेर काढून समाजाशी एकरूप करण्यासाठी आम्ही 'सिटीझन सायन्स मूव्हमेंट  ' सुरु करीत आहोत. 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' या सूत्राने ही चळवळ काम करणार आहे. ही कल्पना तशी नवी नाही. जगात अनेक ठिकाणी नागरी सहभागातून वैज्ञानिक अभियान राबवले जात आहेत. भारतातही विविध सर्वेक्षण आणि निरीक्षणांमध्ये सिटीझन साईंटिस्ट सहभागी होत असतात. मात्र, पुण्यात देशातील पाहिले सिटीझन सायन्स सेंटर सुरु करून सिटीझन साईंटिस्टच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पुण्यातील दहापेक्षा अधिक संशोधन संथांची मदत घेतली जात आहे. हे सेंटर नागरिक आणि संशोधन संस्थांमधील दुवा म्हणूनही कार्य करेल. संशोधन संस्थांना ज्या ठिकाणी नागरी सहभागाची गरज लागेल (निसर्ग, पर्यावरण, आरोग्य सर्वेक्षणे इ.), त्या ठिकाणी या सेंटरच्या माध्यमातून संशोधन संस्थांना सहकार्य करण्यात येईल, तर नागरिकांच्या कल्पनेतून उतरलेल्या संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन आणि प्रयोगाच्या सुविधा संशोधन संस्थांकडून पुरवण्यात येतील. विविध शहरी, पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांवरही विज्ञानाच्या आधारे तोडगा काढण्यासाठी हे केंद्र काम करेल. नागरिकांमधून उच्च दर्जाचे विज्ञान संशोधन घडावे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागावा हा या उपक्रमाचा अंतिम हेतू आहे.
'सिटीझन साईंटिस्ट' हे कोणीही असू शकतील. आयटी प्रोफेशनल, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, राजकारणी, कलाकार, गृहिणी, कोणत्याही शाखेचे विद्यार्थी.. अगदी कोणीही. यात सहभागी होण्यासाठी आवश्यक निकष आहे- 'विज्ञानाची आवड आणि प्रयोगशील वृत्ती'. सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडत्या विषयाचा शास्त्रीय अभ्यास आणि संशोधन करू शकतील. त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन, प्रयोगासाठीच्या सुविधा, जर्नल्स, लायब्ररी सेन्टरच्या माध्यमातून पुरवण्यात येतील (अर्थात सेन्टरच्या स्वतःच्या सुविधा टप्प्या- टप्प्याने निर्माण करण्यात येतील). सिटीझन साईंटिस्टकडून पूर्ण होणारे संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जर्नलही सुरु करण्यात येणार आहे. जे देशभरातील शिक्षण संस्था, शास्त्रज्ञ, संशोधन संस्थांमध्ये वितरीत करण्यात येईल. सिटीझन साईंटिस्ट हे निरनिराळ्या पार्श्वभूमीतून येणार असल्यामुळे त्यांच्या अभ्यासाची समान पार्श्वभूमी निर्माण करण्यासाठी वर्षभर वैज्ञानिक व्याख्याने, सायन्स फिल्म क्लब, विविध विषयांच्या कार्यशाळा, संस्था भेटी, सर्वेक्षणे आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बीएस्सी, एमएस्सी, बीईच्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोजेक्ट सिटीझन सायन्स सेंटरच्या माध्यमातून करता येतील. सिटीझन साईंटिस्टकडे स्वतःचा ठोस प्रकल्प नसल्यास सिटीझन सायन्स सेन्टरच्या पुढाकाराने सुरु झालेल्या 'प्रोजेक्ट मेघदूत', लाईट पोल्युशन मैपिंग, लोणार कन्झर्वेशन सारख्या प्रकल्पांत सहभागी होता येईल. पुण्यातील संशोधन संस्थांना त्यांच्या विज्ञान प्रसार कार्यक्रमामधेही सिटीझन साईंटिस्ट त्यांच्या आवडीप्रमाणे सहकार्य करू शकतील. सहभाग घेऊ शकतील.


विज्ञान संशोधनाला संशोधन संस्थांच्या भिंतीआडून थेट समाजामध्ये रुजवण्याच्या प्रयत्नाला पुणेकर नक्की स्वीकारतील याचा आम्हाला विश्वास आहे. माणसाला आपल्या पारंपरिक समजामधून मुक्त करून वास्तव दाखवण्याचे काम विज्ञान करीत असते. यातूनच माणूस उत्तरोत्तर समृद्ध होत जातो. सिटीझन सायन्स मूव्हमेंटच्या माध्यमातून भक्कम तटबंदीच्या आड औपचारिकतेमध्ये अडकलेल्या विज्ञान संशोधनाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून भारतातील विज्ञान काही अंशी तरी समृद्ध होईल याची खात्री वाटते. आपणही या मूव्हमेंटमध्ये सहभागी व्हा. आपल्या एकत्रित प्रयत्नातूनच 'इन्फोर्मल सायन्स फॉर सायन्स फोर्म्युलेशन' साध्य होऊ शकेल !



तुमची खंत.. उत्तर तुमच्याकडेच!





सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्या एकविसाव्या शतकात भारत महासत्ता बनणार अशा भूलथापांना बळी पडणाऱ्यांना एकदम जमिनीवर आणणाऱ्या आहेत.




बातमी एक: ११ सप्टेंबर, २०१२ 
विज्ञानाभिमुखता आणि विज्ञान साक्षरतेच्या बाबतीत भारतअन्य देशांपेक्षा खूप मागे असल्याचे फ्रान्स येथे चालूअसलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतीय शास्त्रज्ञांनीच जगाच्या यानिदर्शनास आणून दिले आहे समाजालाविज्ञानाभिमुख करण्यासाठी चीनसारख्या देशांत जसे प्रयत्न होत आहेत तसे भारतात होत नाहीत असे मतशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे विशेष म्हणजे १९७० आणि ८०च्या दशकांत ज्या प्रमाणावर प्रयत्न झाले तेप्रमाणही आता कमी झाले आहे आणि धार्मिकतेचे वाढले आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे    
बातमी दोन: २७ सप्टेंबर, २०१२ 
विज्ञानाच्या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर ठसा उमटवू शकलेला नाही अशी खंत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सत्तराव्या स्थापनादिनी व्यक्त केली. मात्र वैज्ञानिकांनी निराश न होता मोठी स्वप्ने बघावीत असे आवाहनही त्यांनी केले. 
आधुनिक जगातील विकासामुळे तयार झालेली गुंतागुंत हाताळण्यात पारंपरिक शास्त्रशाखा आणि दृष्टिकोन तोकडे पडत आहेत असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भाषण सीएसआयआरच्या देशभरातील ३७ केंद्रांमध्ये इंटरनेटमार्फत पोहोचले.

विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्याच नाही, तर देशाविषयी प्रेम वाटणाऱ्या कोणालाही या बातम्या वाचून दुःख व्हावे. एकीकडे विकासदराचे, उंचावणाऱ्या जीवनमानाचे दाखले देणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणात देशाच्या विज्ञानातील प्रगतीविषयी चिंता व्यक्त व्हावी यात आता तसे नवे काही नाही. यंदा राष्ट्रीय विज्ञान दिनी 'सायन्स' या प्रख्यात नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारत विज्ञान क्षेत्रात चीनच्या खूप मागे असल्याचे मत नोंदवले होते. २००५ पासून सलग आठ वर्षे 'सायन्स काँग्रेस'च्या उद्घाटन प्रसंगी ते अशाच आशयाचे भाषण नियमितपणे वाचत आले आहेत. त्याचवेळी विज्ञान संशोधनासाठी जीडीपीच्या दोन टक्के तरतूद करण्यासाठी आमचे सरकार बांधील आहे (फक्त बांधील आहे.. तसे अजून काही झालेले नाही) हेही त्याला जोडून सांगत आले आहेत. 

येत्या जानेवारीमध्ये कोलकात्यामध्ये शंभरावी सायन्स काँग्रेस होत आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा दर वर्षाच्या सुरवातीला आढावा घेणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान करतात असा प्रघात आहे. देशातील मान्यवर शास्त्रज्ञ या परिषदेचे अध्यक्ष असतात. यंदा मात्र स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग या परिषदेचे अध्यक्ष आहेत. १९४८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा असाच बहुमान मिळाला होता. सायन्स काँग्रेसच्या वाटचालीला १०० वर्षे पूर्ण होत असताना डॉ. मनमोहन सिंग यांनाही हाच बहुमान मिळाला आहे. 

देशाच्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल वास्तववादी विचार मांडल्याबद्दल खरतर पंतप्रधानांचे अभिनंदन करायला हवे. मात्र, तसे करणे साफ चुकीचे ठरेल.. याचे मुख्य कारण देशाच्या विज्ञान क्षेत्राच्या अशा अवस्थेबद्दल सध्याच्या सरकारचे प्रमुख म्हणून त्यांची सर्वाधिक जबाबदारी आहे.

पंडित नेहरू यांना विज्ञान परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, याला स्वातंत्र्यानंतरची पाहिली सायन्स कॉंग्रेस म्हणून महत्व होतेच, मात्र स्वतंत्र भारताची जडण- घडण विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारावर व्हावी हे त्यांचे त्या मागील विचार आणि त्याला धरून त्याकाळी त्यांनी उचललेली पावले अधिक कारणीभूत होती. देशाच्या आतापर्यंतच्या वैज्ञानिक विकासात महत्वाचे योगदान दिलेल्या सीएसआयआर, अणुऊर्जा आयोग, आयआयटी, इंकोस्पार (आजची इस्रो), डीआरडीओ आदी संस्थांची पायाभरणी नेहरूंच्या काळात झाली आणि त्या संस्थांच्या मागे ते स्वतः भक्कमपणे उभे राहिले. डॉ. मनमोहन सिंग यांना अध्यक्ष करताना आजच्या भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांच्यात आणि नेहरुंमध्ये साम्य हेरताना डॉ. सिंग यांनी विज्ञान तंत्रज्ञानासाठी वाढवलेल्या आर्थिक तरतुदीचा हवाला दिला आहे. (अनेक शास्त्रज्ञांच्या मते सायन्स काँग्रेसचा शंभर हा आकडा खरतर डॉ. सिंग यांना अध्यक्ष बनवण्यासाठी कारणीभूत आहे)

ज्या 'सायन्स' या अमेरिकन जर्नलला पंतप्रधानांनी मुलाखत दिली होती, त्याच 'सायन्स'चे संपादक प्रा. ब्रूस अल्बर्टस यांची त्याच्या थोडे आधी मी पुण्यात मुलाखत घेतली होती. भारताच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीवर आणि आव्हानांवर त्यावेळी ते बरेच बोलले. त्या मुलाखतीत त्यांनी नेहरूंच्या संसदेतील भाषणांचा हवाला देताना 'वैज्ञानिक दृष्टीकोन' भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी कसा उपयुक्त ठरेल हे सांगितले. देशाच्या नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीला लागला तर स्वाभाविकपणे तो लॉजिकल विचार करू लागेल. अगदी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या सर्व उमेदवारांना नागरिक वस्तूनिष्ठपणे तपासून घेतील आणि मगच मत देतील. त्यातून अधिक योग्य उमेदवार निवडून येतील, त्यातून लोकशाही बळकट होत जाईलच पण देशाचा विकासही साधेल. भारताला नेहरूंच्या त्या भाषणाचा विसर पडला असल्याची खंत प्रा. अल्बर्टस यांनी व्यक्त केली. वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी अगदी प्राथमिक शिक्षणापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांद्वारेही सर्वसामन्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे त्यांनी मुलाखतीत नमूद केले.

सायन्स कॉंग्रेसच्या शताब्दी वर्षात घडलेल्या काही घटनांनी प्रा. ब्रूस अल्बर्टस यांच्या मुलाखतीतील विविध मुद्द्यांचे महत्व सतत जाणवत गेले.   
- पुण्यात पत्रिकेतील दोषामुळे एका सुशिक्षित (?) नागरिकाने आपल्या सगळ्या कुटुंबाला संपवले. 
- पुण्यात आघारकर संशोधन संस्थेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. अनिल काकोडकरांना जैतापूरविषयी भाषण देण्यापासून रोखले.
- स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कुडनकोलमचे काम बंद.
- उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये पुन्हा जातीची समीकरणे महत्वाची ठरली.
- 'फोरजी स्कॅम'मुळे इस्रोच्या माजी अध्यक्षांना सरकारी पदांवर कायमस्वरूपी बंदी.

लोकांचे दैनंदिन जीवन असो, देशाच्या विकासासाठी उचलण्यात येणारी पावले असोत, किंवा राजकारण.. विज्ञान निरक्षरतेचे परिणाम सगळीकडे ठळकपणे दिसून येत आहेत.
देशाच्या उर्जेची समस्या सोडवण्यासाठी आपण लाख अणुभट्ट्या उभारू पण त्यांचे कार्य, त्या मागील विज्ञान, त्यांचे महत्व सर्वसामान्यांना माहित नसेल तर काय? जैतापूर आणि कुडनकुलमवरून दिसत आहेच. दूरसंचारक्रांती आणि त्यातून देशाचा विकास साधण्यासाठी आपण लाख उपग्रह अवकाशात सोडू.. पण त्यांच्या आधारे दिसणाऱ्या टीव्हीवर लोक सर्वाधिक काय पाहतात? (किंवा दाखवले काय जाते) राशीभविष्य आणि त्यावरील उपाय. 'आयसर'सारख्या विज्ञानाच्या अत्याधुनिक संस्थांमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली जाते. मग असेच आयसर असणाऱ्या पुण्यात सुशिक्षित म्हणवले जाणारे कुटुंब पत्रिकेत मंगळ असल्यामुळे संपवले कसे जाऊ शकते?

वैज्ञानिक दृष्टीकोन घरातील संस्कारातून निर्माण व्हावा अशी स्थिती भारतात तरी नक्कीच नाही. शाळेमधेच काही होऊ शकले तर. आणि शाळेतील शिक्षणाकडे पहिले, तर आज दिसणाऱ्या या सगळ्या प्रश्नांचे मूळ आपल्याला तिथेच सापडेल.            

सध्या आम्ही गोव्याच्या ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विज्ञानाचे कार्यक्रम घेत आहोत. दहा शाळांपैकी नऊ शाळांमध्ये आठवी- नववीच्या विद्यार्थ्यांना अणु म्हणजे काय? त्याची रचना कशी असते, किंवा सूर्यमालेतील ग्रह किती आणि त्यांचा क्रम काय हे सांगता आले नाही. एका शाळेतील मुख्याध्यापिका म्हणाल्या, 'तरीही हे सगळे पास होणार. त्यांना पास कसे व्हायचे हे माहित आहे.' मनात विचार आला, मुले विज्ञानात पास झाली, तरी अणुची रचनाच माहित नसेल, तर त्याच्या शक्तीविषयी पुढे गैरसमज होणे स्वाभाविक नाही का? सूर्यमालेतील ग्रहांची माहितीच नसेल, तर ते मानवावर परिणाम करू शकतात या अंधश्रद्धेला बळी का नाही पडणार? शाळेच्या पुस्तकातील या साध्या आणि मूलभूत संकल्पना पुढे जाऊन याच मुलांच्या आयुष्यावर (आणि परिणामी देशाच्या प्रगतीवर) दूरगामी परिणाम करणार आहेत हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही?
माझा मित्र दिनेश निसंग हा संडे सायन्स स्कूल या नावाने शहरातील मुलांसाठी वैज्ञानिक प्रयोगांचा उपक्रम राबवतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, 'या बाबतीत शहरातही फारशी चांगली स्थिती नाही. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनाच स्पष्ट नाहीत. त्या स्पष्ट व्हाव्यात यासाठी शाळेतून विशेष प्रयत्न केले जात नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि लेखी परीक्षेसाठी तयारी करून घेणे हे एकमेव उद्दिष्ट. मुले नुसती पास होत नाहीत, तर उत्तम मार्क मिळवतात. पण 'संकल्पना'.. बहुतेकांना समजलेल्याच नसतात.'

मग सरकारला या गोष्टी लक्षात येत नाहीत का? येत कशा नाहीत.. त्यासाठीच त्यांनी विज्ञान- तंत्रज्ञानासाठी अभूतपूर्व आर्थिक मदतीचा ओघ सुरु केला आहे. आयसर या संस्थेच्या एका शाखेला (देशात अशा पाच आयसर आहेत) पहिल्या पाच वर्षांसाठी ५०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. आयआयटी, एनआयटीची संख्या वाढवली आहे, त्यांच्याही आर्थिक मदतीत मोठी वाढ केली आहे. शालेय स्तरातून वैज्ञानिक प्रतिभा शोधण्यासाठी 'इन्स्पायर'सारखी शिष्यवृत्ती सुरु केली आहे. देशातील प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यंना विज्ञान प्रकल्पांसाठी पाच हजार रुपये रोख, त्यानंतर त्या प्रकल्पांचे प्रदर्शन मांडण्यासाठी विभाग स्तरावर दहा- दहा लाख रुपये.. थोडक्यात सरकारने विज्ञान शिक्षणावर कित्येक अब्ज रुपये खर्च करण्यास सुरुवात केली आहे. आणि शास्त्रज्ञ घडवण्याची आपली जबाबदारी पार पडली आहे....

सरकार जर विज्ञानासाठी एवढे करत असेल तर मग पंतप्रधानांना देशातील विज्ञानाच्या बाबतीत सतत नकारार्थी विधाने का करावी लागतात? 

परत इथे प्रश्न येतो 'लॉजिकल थिंकिंग'चा. सरकारचे सगळे प्रयत्न हे महाविद्यालयीन स्तराचे आहेत. त्यामुळे देशातील मोजक्याच विद्यार्थ्यांना (ज्यांना शालेय शिक्षण उच्च दर्जाचे मिळते) या शिक्षणाचा लाभ घेता येतो. यातील बहुतेक असे विद्यार्थी असतात, जे सरकारी मदतीशिवायही शास्त्रज्ञ होऊ शकतात. विज्ञानाच्या संकल्पना ज्यांच्या पक्क्या आहेत, अशांनाच या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो आणि अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. इतर ९९ टक्के विद्यार्थ्यांचे काय? 

त्यांना शास्त्रज्ञ बनवायचे राहूद्यात पण किमान शालेय स्तरावर त्यांना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झाल्या, तर भविष्यात देशात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर निर्माण होऊ शकणाऱ्या अनेक प्रश्नांवर आधीच तोडगा निघू शकेल. या संकल्पना शिकताना त्यांच्या मध्ये निर्माण होणारी चिकित्सक वृत्तीच देशाची लोकशाही बळकट करण्यास महत्वाची भूमिका निभावू शकते.

देशात अजूनही बहुतेक शाळांमध्ये प्रयोगशाळाच नाहीत. 'शिक्षक' या संकल्पनेचीच नवी व्याख्या करायला हवी अशी अवस्था आहे. जे उद्याच्या शास्त्रज्ञांचा पाया पक्का करणार आहेत, त्यांचा पाया आधी पक्का आहे का? परीक्षाकेन्द्री अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवत आहे. त्यातून ज्ञान मिळवण्याचे काय? प्रज्ञा शोधाच्या नावाखाली अब्जावधी रुपये विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांवर उधळणाऱ्या सरकारने त्याच्या निम्मा खर्च करून त्याच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शाळेला प्रयोगशाळा उभ्या करून दिल्या, त्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना योग्य प्रकारे प्रशिक्षित केले, शालेय अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली, तर आयसर, आयआयटीसारख्या संस्थांमध्ये उर्वरित ९९ टक्के विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व दिसू शकेल.

वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट झालेले हे विद्यार्थी फक्त शास्त्रज्ञच बनतील असे नाही. त्यांच्यापैकी काही जण शिक्षक होतील, जे पुन्हा नव्याने संकल्पना स्पष्ट असणारे विद्यार्थी घडवतील. काही जण माध्यमांमध्ये जातील, जे सध्या माध्यमांमधून सुरु असणारा अंधश्रद्धेचा प्रसार रोखतील. काही जण राजकारणात जातील, जे देशाच्या विकासासाठी विज्ञान- तंत्रज्ञानाच्या आधारे धोरणे आखतील. काही जण प्रशासनात जातील, जे त्या धोरणांची वस्तुनिष्ठपणे अंमलबजावणी करतील. काही जण साहित्यिक होतील, जे विज्ञान साहित्य निर्माण करून सर्वसामान्यांना विज्ञानाकडे आकर्षित करतील. आणि अगदीच काही नाही, तरी जबाबदार नागरिक नक्की बनतील, जे सारासार विचार करून सुयोग्य उमेदवाराला निवडून देऊन देशाचे हित साधतील.

येत्या सायन्स काँग्रेसपासून पुढील दहा वर्षे सरकारने उच्च शिक्षणाबरोबर प्राथमिक विज्ञान शिक्षणावर लक्ष केंद्रित करून प्रामाणिक प्रयत्न केले, तर तेव्हाच्या पंतप्रधानांना विज्ञानाबाबतची खंत व्यक्त करावी लागणार नाही.

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१२

दुष्काळाचे नियंत्रक


AmJ_ZmnmgyZ gw_mao _{hZm^a XS>r _maë`mda _mÝgyZ _hmamï´>mgh XoemÀ`m ~hþVm§e ^mJmV gH«$s` Pmbm Amho. nO©Ý`_mZmMo AmH$S>o hiyhiy gwYmaV AmhoV. _mÌ, Eb {ZZmogma»`m KQ>H$mMo gmdQ> `§XmÀ`m _mÝgyZda AÚmnhr Amho. Ë`m_wio 2002 Am{U 2009 à_mUo `§XmMo df©hr XþîH$mir R>aVo H$s H$m` Aer eŠ`Vm hdm_mZVÁkm§H$Sy>Z ì`º$ hmoV Amho. Joë`m dfu h§Jm_mVrb gamgarÀ`m 102 Q>¸o$ nmD$g XoUmam _mÝgyZ `§Xm _mÌ, {ZamimM amJ AmidVmZm {XgV Amho. Ë`m_mJo g_wÐ Am{U hdm_mZmVrb AZoH$ KQ>H$ H$maUr^yV AmhoV. `mVrb H$mhr KQ>H$m§da ZOa Q>mH$ë`mg _mÝgyZ hr {H$Vr pŠbï> KQ>Zm Amho Am{U Ë`m_wio {VMm AMyH A§XmO dV©dUo {H$Vr H$R>rU Amho ho ñnï> hmoVo.

_mÝgyZ_Yrb "~«oH$' Agm_mÝ` ZmhrV:
_mÝgyZZo g§nyU© ^maV ì`mnë`mda h§Jm_mV Ë`mMo à_mU gmaIo ZgVo. àXoemZwgma Am{U H$mbmdYrZwgma Ë`mV gVV MT> CVma `oV AgVmV. _mÌ, Xadfu _mÝgyZÀ`m h§Jm_mV EImXm AmR>dS>m Agm `oVmo Á`mdoir XoemÀ`m ~hþVm§e ^mJmVyZ nmD$g Jm`~ hmoVmo. `mbm H$maUr^yV R>aUmam _hÎdmMm KQ>H$ åhUOo _mÝgyZMm nyd©- npíM_ H$_r Xm~mMm nÅ>m (_mÝgyZ Q´>\$: `m Q´>\$À`m {R>H$mUr Z¡F$Ë` _mog_r dmao Z¡F$Ë`oH$Sy>Z dm`ì`oH$S>o diV AgVmV.). `m nQ²>Q>çmMr gm_mÝ` pñWVr n§Om~nmgyZ gwê$ hmoD$Z _Ü` ^maVm_YyZ ~§JmbMm CngmJa Aer AgVo. _mÝgyZ H$mimV H$mhr H$maUm§_wio hm nÅ>m Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrÀ`m X{jUobm qH$dm CÎmaobm gaH$V AgVmo. Am{U Vmo Á`m {Xeobm gaH$Vmo Ë`m ^mJmVrb nmdgmMo à_mU dmT>Vo. hm nÅ>m Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrnojm ~amM CÎmaobm åhUOo {h_mb`mÀ`m nm`Ï`mer nmoMbm H$s Ë`m ^mJmV Am{U B©emÝ` ^maVmVrb nmdgmMo à_mU dmT>Vo. _mÌ, `mdoir ~hþVm§e ^maVmVyZ nmD$g Jm`~ hmoVmo. _mÝgyZ Xoe^a nmoMë`mda V`ma hmoUmam hm _mÝgyZ Q´>\$ `§Xm 19 Owb¡n`ªV {h_mb`mÀ`m nm`Ï`mer Agë`mZo XoemÀ`m BVa ^mJmV nmdgmZo {dlm§Vr KoVbr hmoVr.
_mÝgyZ Q´>\$ à_mUoM dm`ì`oH$Sy>Z dmid§Q>mdê$Z `oUmè`m H$moaS>çm dmè`m§_wiohr _Ü` ^maVmVrb nmdgmda _moR>m n[aUm_ hmoVmo. `m H$moaS>çm dmè`m§_Yrb Yy{bH$U Am{U EAamogmob^modVr _Ü` ^maVmV O_m Pmbobo ~mîn O_m hmoD$ bmJë`mZo nmD$g XoUmè`m T>Jm§À`m {Z{_©Vr_Ü`o AS>Wim {Z_m©U hmoD$Z nmdgm_Ü`o I§S> nS>Vmo. `m dmè`m§Mm Omoa A{YH$ Agob, Va Z¡F$Ë` _mog_r dmè`m§Zmhr AS>Wim {Z_m©U hmoD$Z Ë`m_wiohr _mÝgyZ_Ü`o ~«oH$ nS>Vmo.
Eb {ZZmo qH$dm Eb {ZZmo gXZ© Am°pñgboeZ (EÝgmo):
gw_mao drg dfmªnmgyZ Eb {ZZmo Am{U _mÝgyZÀ`m g§~§Ym§da ~arM MMm© gwê$ Amho. E|erÀ`m XeH$mV ^maVr` hdm_mZemókm§Zr Eb {ZZmo gH«$s` AgVmZm Ë`mMm ^maVr` _mÝgyZda à{VHy$b n[aUm_ hmoV Agë`mMo XmIdyZ {Xbo. {dfwdd¥Îmr` nyd© àem§V _hmgmJamVrb g_wÐmÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ gamgarnojm gVV nmM _{hZo 0.5 A§e qH$dm Ë`mnojm A{YH$ am{hbo Va `m pñWVrbm Eb {ZZmo åhQ>bo OmVo. (X{jU A_o[aHo$Odirb àem§V _hmgmJamV hr KQ>Zm {¼g_gÀ`m Xaå`mZ hmoV Agë`m_wio `mMo ñn°{Ze ^mfoV "Eb {ZZmo' åhUOoM bhmZ _yb qH$dm {¼ñV ~mi Ago Zm_H$aU Pmbo.) `mM doir npíM_ àem§V _hmgmJamV Am{U qhXr _hmgmJamV OmñV Xm~mMo joÌ V`ma hmoVo. hdm_mZmÀ`m `m pñWVrbm hdm_mZemór` ^mfoV Eb {ZZmo gXZ© Am°pñgboeZ (EÝgmo) åhQ>bo OmVo. EÝgmoMr CîU pñWVr AgVmZm (Eb {ZZmo) ~hþVoH$doim Ë`mMm ^maVr` _mÝgyZda à{VHy$b n[aUm_ hmoVmo, Va EÝgmoMr W§S> pñWVr AgVmZm (bm {ZZm) Ë`mMm ^maVr` _mÝgyZda AZwHy$b n[aUm_ hmoVmo Ago {XgyZ Ambo Amho.
`§Xm {dfwdd¥Îmr` nyd© àem§V _hmgmJamÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ OyZÀ`m gwadmVrnmgyZ dmT>Ê`mg gwê$dmV Pmbr Amho. Ë`m_wio Eb {ZZmo nyU©nUo {dH${gV hmoÊ`mgmR>r Am°ŠQ>mo~a COmS>ob Ago hdm_mZemókm§Zm dmQ>Vo. åhUyZM `§Xm Ë`m pñWVrMm naVrÀ`m _mÝgyZda {dn[aV n[aUm_ hmoÊ`mMr eŠ`Vm dV©dÊ`mV Ambr Amho. _mÌ, XþgarH$S>o EH$ Aä`mg Agohr XmIdVmo H$s, Eb {ZZmo {dH${gV hmoV AgVmZmhr _mÝgyZda Ë`mMm à{VHy$b n[aUm_ hmoD$ eH$Vmo. 1918, 1951, 1965, 1972, 1982, 1987, 2002 `m dfu Ambobo XþîH$mi ho Eb {ZZmoÀ`m {dH${gV hmoÊ`mÀ`m à{H«$`oXaå`mZMo hmoVo. `§Xmhr VerM pñWVr amhÊ`mMr eŠ`Vm hdm_mZemók dV©dV AmhoV. Eb [ZZmo gH«$s` hmoV AgVmZm ^maVr` CnI§S>mXaå`mZ `§Xm {XgV AgUmar _hÎdmMr bjUo åhUOo H$_r Xm~mÀ`m joÌm§Mm A^md (h§Jm_mV ~§JmbÀ`m CngmJamV n{hbo H$_r Xm~mMo joÌ 21 Owb¡ amoOr {Z_m©U Pmbo Amho.). _mÝgyZ H$mimV gmYmaUnUo _{hÝ`mbm XmoZ A{VVrd« H$_r Xm~mMr joÌo Á`mbm {S>àoeZ åhUVmV, V`ma hmoUo Ano{jV AgVo. `§Xm _mÌ Aem joÌm§À`m A^mdm_wio gd©Xÿa Am{U OmoamMm nmD$g AZw^dm`bm {_imbobm Zmhr.
B§{S>`Z AmoeZ S>m`nmob (Am`AmoS>r):
gmYmaUnUo Eb {ZZmo à_mUoM hm KQ>H$hr _mÝgyZda n[aUm_ H$aVmo Ago {XgyZ Ambo Amho. qhXr _hmgmJamV ^maVmÀ`m nyd© Am{U npíM_ ^mJmVrb g_wÐmÀ`m n¥ð>^mJmMo Vmn_mZ gamgarnojm EH$mAmS> EH$ Ago H$_r A{YH$ amhV AgVo. Á`mdoir npíM_ {h§Xr _hmgmJamVrb g_wÐn¥ð>mMo Vmn_mZ gamgarnojm A{YH$ am{hb (nm{PQ>rìh Am`AmoS>r) Ë`mdoir ^maVmV Mm§Jbm nmD$g nS>Vmo, Va B§S>moZo{e`m Am°ñQ´>o{b`mV Ë`mÀ`m {dê$Õ pñWVr AgVo. Á`mdoir nyd© {h§Xr _hmgmJamVrb g_wÐn¥ð>mMo Vmn_mZ gamgarnojm A{YH$ AgVo ({ZJoQ>rìh Am`AmoS>r), Ë`mdoir ^maVmVrb _mÝgyZda Ë`mMm à{VHy$b n[aUm_ hmoVmo. 2009 gmbr Amboë`m XþîH$mimXaå`mZ Eb {ZZmo gH«$s` AgyZhr Am`AmoS>r nm°{PQ>rìh am{hë`m_wio CÎmamYm©V Mm§Jbm nmD$g Pmbm hmoVm. `§Xm AÚmnn`ªV Var Am`AmoS>rMr 2009 à_mUo _mÝgyZbm gmW bm^bobr Zmhr.  
{V~o{Q>`Z A±Q>rgm`ŠbmoZ:
{h_mb`mÀ`m {Z{_©Vr~amo~a ^maVr` CnI§S>mV _mÝgyZ gw_mao nmM H$moQ>r dfmªnmgyZ Xadfu Z MwH$Vm ^oQ> XoV Amho. `mbm H$maUr^yV AgUmam EH$ _hÎdmMm KQ>H$ åhUOo {V~oQ>darb A±Q>rgm`ŠbmoZ. Zmdmà_mUoM `m _Ü`o gm`ŠbmoZÀ`m åhUOoM MH«$sdmXimÀ`m {dê$Õ à{H«$`m KS>V AgVo. `m joÌmVyZ dmao ~mhoaÀ`m {XeoZo T>H$bbo OmV Agë`m_wio A±Q>rgm`ŠbmoZÀ`m à^md joÌmV n¥ð>^mJmdê$Z `oUmè`m ~mhoarb dmè`m§Zm àdoe {_iV Zmhr. {V~oQ>Mo nR>ma g_wÐgnmQ>rnmgyZ gmYmaUnUo nmM {H$bmo_rQ>a C§Mrda Amho. Ë`m C§MrÀ`mhr da dmVmdaUmV gw_mao VrZ {H$bmo_rQ>an`ªV {V~oQ>À`m A±Q>rgm`ŠbmoZMr ì`már Agë`m_wio `m A±Q>rgm`ŠbmoZÀ`m ê$nmZo EH$ Z¡g{J©H$ q^V _mÝgyZÀ`m h§Jm_mV {V~oQ>À`m nR>mamda gH«$s` AgVo. `m joÌm_wio CÎmaoH$Sy>Z Am{U npíM_oH$Sy>Z `oUmè`m W§S> Am{U H$moaS>çm dmè`m§Zm à{V~§Y Pmë`m_wio Z¡F$Ë` _mog_r dmao CnI§S>mV {dZm AS>Wim `oVmV Am{U gmo~V nmD$g AmUVmV. Oa {V~oQ>Mo A±Q>rgm`ŠbmoZ Ë`m OmJoda V`ma Pmbo ZgVo, Va ^maVmV _mÝgyZ ~agUo eŠ` Pmbo ZgVo.
{V~oQ>À`m A±Q>rgm`ŠbmoZMr gm_mÝ` pñWVrhr _hÎdnyU© AgVo. Á`mdoir ho A±Q>rgm`ŠbmoZ Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrda qH$dm Ë`mÀ`m npíM_obm Agob, Voìhm XoemV Mm§Jbm nmD$g hmoVmo Ago bjmV Ambo Amho. _mÌ, Á`mdoir ho A±Q>rgm`ŠbmoZ Ë`mÀ`m gm_mÝ` {ñWVrÀ`m WmoS>o nyd}bm Agob, Ë`mdoir npíM_oH$Sy>Z `oUmè`m dmè`m§Zm ^maVr` CnI§S>mV `oÊ`mgmR>r OmJm {_iVo Am{U Ë`mMm à{VHy$b n[aUm_ _mÝgyZ H$mimVrb nmdgmda hmoVmo. `§Xm h§Jm_ gwê$ Pmë`mnmgyZ `m A±Q>rgm`ŠbmoZMr pñWVr Ë`mÀ`m gm_mÝ` pñWVrÀ`m nyd}bm amhV Agë`mMo {XgyZ Ambo Amho. Ë`mMmhr n[aUm_ `m H$mimVrb nmdgmda Pmbm Agë`mMo hdm_mZemókm§Mo åhUUo Amho. {V~oQ>r`Z A±Q>rgm`ŠbmoZMr pñWVr Am{U Eb {ZZmo `m§Mmhr g§~§Y AYmoao{IV Pmbm Amho.
EAamogmob:
Z¡F$Ë` _mog_r dmao g_wÐmdê$Z `oVmZm ~mîn dmhÿZ AmUV AgVmV. ^yn¥ð>mda dmVmdaUmV AgUmè`m gyú_ Yw{bH$Um§da (EAamogmob) ho ~mîn ~gyZ _oKq~Xÿ V`ma hmoVmV, Ë`mVyZ T>Jm§Mr {Z{_©Vr hmoVo. H$_r Xm~mÀ`m joÌmVyZ qH$dm nd©Vm§Mm AmYma KoD$Z ho T>J dmVmdaUmV C§Mmda Jobo H$s Ë`mVyZ Xdq~Xÿ V`ma hmoD$Z nmD$g nS>Vmo. _mÌ, dmVmdaUmVrb EAamogmobMr g§»`m dmT>V Jobr Va CnbãY ~mînmMo {dKQ>Z hmoV OmD$Z àË`oH$ EAamogmobgmR>rÀ`m ~mînmMo à_mU H$_r hmoV OmVo. `m_wio _oKq~Xÿ V`ma hmoÊ`mÀ`m à{H«$`oV AS>Wim {Z_m©U hmoVmo. n[aUm_r nmD$g XoÊ`mè`m T>Jm§Mr {Z{_©Vr hmoV Zmhr. dmid§Q>mH$Sy>Z `oUmè`m Yy{bH$Um§À`m dmXim§_wio _Ü`, CÎma ^maVmVrb dmVmdaUmaV EAamogmobMo à_mU dmT>bo, Va Ë`mMm à{VHy$b n[aUm_ VoWrb nmdgmda hmoVmo. àXÿ{fV àXoe, VgoM O§Jbm§Zm bmJUmè`m dUì`m§_YyZ dmVmdaUmV {_giUmè`m A{V[aº$ EAamogmobMmhr n[aUm_ nmdgmda hmoD$ eH$Vmo, Ago Aä`mgmVyZ {ZînÞ Pmbo Amho.

- मयुरेश प्रभुणे 
म. टा. संवाद मधून साभार 


भविष्यवेधी उड्डाण


    XmoZ dfmªnyduM B§{S>`Z BpÝñQ>Q>çyQ> Am°\$ ñnog gm`Ýg A±S> Q>oŠZm°bm°OrMo (Am`Am`EgQ>r) {dÚmWu ñdV: gmD§$S>tJ am°Ho$Q> V`ma H$aÊ`mMm àH$ën H$arV Agë`mMo H$mZmda Ambo hmoVo. VoìhmnmgyZM `m am°Ho$Q>{df`r _ZmV Iyn CËgwH$Vm hmoVr. `mbm H$maUhr VgoM Amho. A_o{aH$m, `wamon Am{U a{e`m_Ü`o am°Ho$Q>{Z{_©VrMr EH$ _moR>r g§ñH¥$Vr {dH${gV Pmbr Amho. {VH$S>o hm¡er nmVirdahr N>moQ>r am°Ho$Q> V`ma H$aÊ`mV `oVmV. _mÌ, ^maVmV gwajoÀ`m H$maUmñVd gaH$mar g§ñWm§_YyZM (^maVr` AdH$me g§emoYZ g§ñWoVyZM- Bòmo) am°Ho$Q> V`ma Ho$bo OmVo. 1963 _Ü`o ^maVmVyZ n{hbo gmD§$S>tJ am°Ho$Q>Mo CÈ>mU Pmbo hmoVo. ZmgmZo V`ma Ho$boë`m ZmB©Ho$ AmnmMr `m am°Ho$Q>_Ü`o d¡km{ZH$ CnH$aU (nobmoS>) \«$mÝgMo hmoVo. ^maVr` V§Ìkm§Zr ^maVr` O{_Zrdê$Z Ë`mMo CÈ>mU Ho$bo, hmM H$m` Vmo Ë`mVrb ^maVmMm gh^mJ. _mÌ, nwT>rb MmaM dfmªV ^maVr` g§emoYH$m§Zr amo{hUr 75 `m n{hë`m ñdXoer ~ZmdQ>rÀ`m gmD§$S>tJ am°Ho$Q>Mo `eñdr àjonU H$ê$Z ^maVr` AdH$me H$m`©H«$_mMr _whÿV©_oT> amodbr. Ë`mZ§Va AmOn`ªV XmoZ hOmam§hÿZ A{YH$ gmD§$S>tJ am°Ho$Q>Mo àjonU {Vê$AZ§Vnwa_Odirb Ww§~mÀ`m am°Ho$Q> bm±qMJ ñQ>oeZdê$Z Pmbo Amho. hr gd© am°Ho$Q> BòmoÀ`m à{e{jV V§Ìkm§_m\©$V V`ma H$aÊ`mV Ambr hmoVr.
डॉ. कलाम ७० च्या दशकात साउन्डींग रॉकेट ची जोडणी करताना
_mÌ, d`mÀ`m {derV AgUmè`m {dÚmÏ`mªZr ~Zdboë`m gmD§$qS>J am°Ho$Q>Mo CÈ>mU 1960À`m XeH$mZ§Va àW_M hmoUma hmoVo. BòmoÀ`m nwT>mH$mamZo gwê$ Pmboë`m Am`Am`EgQ>rÀ`m n{hë`m ~°MÀ`m {dÚmÏ`mªZr gmD§$S>tJ am°Ho$Q> ~Z{dÊ`mMm àH$ën XmoZ dfmªnydu hmVmV KoVbm hmoVm. gwê$dmVrbm n{hë`m ~°MÀ`m ghm {dÚmÏ`mªMm `mV g_mdoe hmoVm. Z§Va Ë`mV Xþgè`m Am{U {Vgè`m ~°MMo {dÚmWuhr gh^mJr Pmbo Am{U EHy$U 26 {dÚmÏ`mªZr {dH«$_ gmam^mB© AdH$me H|$ÐmÀ`m emókm§À`m _mJ©Xe©ZmImbr am°Ho$Q>À`m {Z{_©Vrbm gwê$dmV Ho$br. V§ÌkmZ joÌmV am°Ho$Q> {Z{_©Vr hr gdm©V AmìhmZmË_H$ _mZbr OmVo. am°Ho$Q>À`m AmamIS>çmnmgyZ Ë`mVrb B§YZmMr {Z{_©Vr Am{U Ë`mda ~gdÊ`mV `oUmè`m emór` CnH$aUm§Mo H$m`© `m gd© Jmoï>r g_m§VanUo {dH${gV H$amì`m bmJVmV. VgoM, AmamIS>m V`ma H$aVmZm H$mJXmda Ho$bobr gd© J{UVo àË`jmV OerÀ`m Ver CVabr, VaM am°Ho$Q>Mo àjonU `eñdr hmoVo. Am`Am`EgQ>rÀ`m {dÚmÏ`mªZr ho AmìhmZ pñdH$mabo Am[U BòmoÀ`m amo{hUr gmD§$S>tJ am°Ho$Q>Mr à{VH¥$Vr V`ma H$aÊ`mEodOr ñdV:Mo Zdo am°Ho$Q> V`ma H$aÊ`mMo R>a{dbo.
XoemV Agm à`moJ n{hë`m§XmM hmoV Agë`mZo H$moUVmhr AZw^d nmR>rer ZìhVm. am°Ho$Q>Mo {S>PmB©Z Zì`mZo H$aÊ`mV Ambo. Ë`mÀ`m B§YZmVhr H$mhrgm ~Xb H$ê$Z Zdo V§Ì dmnaÊ`mMo R>a{dbo Jobo. Ë`mda nobmoS>hr Zì`m àH$maMm ~gdÊ`mMo {Z{íMV H$aÊ`mV Ambo. Iè`m AWm©Zo XoemVrb Zì`m am°Ho$Q>Mr {Z{_©Vr `mVyZ hmoUma hmoVr. 26 OUm§_Ü`o _J {d{dY JQ> V`ma H$aÊ`mV Ambo. EH$m JQ>mZo {\${OŠg_Yrb VÎdo Aä`mgyZ am°Ho$Q>Mm AmamIS>m V`ma Ho$bm. Ë`mMo dOZ- C§Mr H$m` Agmdr , {H$Vr C§Mrn`ªV Vo CS>mdo, Ë`mgmR>r Ë`mbm dmVmdaUmMm {damoY {H$Vr hmoD$ eH$Vmo AmXr Jmoï>r Ü`mZmV KoD$Z Ë`mMm AmH$ma {Z{íMV H$aÊ`mV Ambm. Xþgè`m EH$m JQ>mZo am°Ho$Q>_Yrb gdm©V _hÎdmMm ^mJ AgUmè`m B§YZmÀ`m {Z{_©VrMr O~m~Xmar ñdrH$mabr. amo{hUr gmD§$S>tJ am°Ho$Q>_Yrb KZ B§YZ V`ma AgVmZmhr Ë`mVrb {_lUmV H$mhrgo ~Xb H$ê$Z Zdm à`moJ H$aÊ`mMo Ë`m§Zr R>a{dbo Am{U am°Ho$Q>gmR>r bmJUmar _moQ>a (B§YZmMo KZ R>moH$io) ìhrEgEggrÀ`m emókm§À`m XoIaoIrImbr V`ma Ho$br. {Vgè`m JQ>mZo am°Ho$Q>da ~g{dÊ`mV `oUmè`m nobmoS>Mr O~m~Xmar ñdrH$mabr. Ë`mgmR>r Q´>m` A°pŠgg A°pŠgbamo_rQ>a ho Zdo d¡km{ZH$ CnH$aU V`ma H$aÊ`mV Ambo, Oo am°Ho$Q>À`m CÈ>mUmnmgyZ Vo g_wÐmV nS>on`ªV Ë`mÀ`m ËdaUmMr {Ì{_Vr` ñdê$nmV _m{hVr J«mD§$S> ñQ>oeZH$S>o nmR>dob. hm à`moJ àW_M hmoV Agë`mZo VgoM EH$ CnH$aU ìhrEgEggrÀ`m emókm§Zrhr ñdV: V`ma Ho$bo Oo VwbZogmR>r `m am°Ho$Q>da ~g{dÊ`mV `oUma hmoVo. AmUIr EH$m JQ>mZo `m gd© JQ>m§À`m gwgyÌrH$aUmMr Am{U ì`dñWmnZmMr O~m~Xmar ñdrH$mabr.
am°Ho$Q> V`ma Pmbo, nobmoS>hr V`ma Pmbm. am°Ho$Q>Mo Zm_H$aU H$m` H$amdo `mgmR>r {dÚmÏ`mªMr ~arM MMm© Pmbr. Ë`mVyZ EH$m Zmdmda gdmªMo EH$_V Pmbo Vo åhUOo ì`mo_. ì`mo_ åhUOo AmH$me, Á`mbm H$moUVrhr gr_m Zmhr. IaoVa \o$~«wdmar 2012 _Ü`oM `m am°Ho$Q>Mo àjonU ìhm`Mo hmoVo. _mÌ, H$mhr àemgH$s` H$m_m§_wio Ë`mbm {db§~ Pmbm. eodQ>r 11 _o amoOr åhUOoM amï´>r` V§ÌkmZ {XZmbm gm`§H$mir ghm dmOyZ 30 {_{ZQ>m§Zr XoemVrb {dÚmÏ`mªZr V`ma Ho$boë`m n{hë`m am°Ho$Q>À`m àjonUmMr doi {ZpíMV H$aÊ`mV Ambr.
hm Aem àH$maMm n{hbmM à`moJ Agë`m_wio `mMr _m{hVr _mÜ`_m§Zm XoÊ`mV Ambr ZìhVr. \$º$ Am`Am`EgQ>rMo {dÚmWu, àmÜ`mnH$, ìhrEgEggrMo emók Am{U H$mhr {Z_§{ÌVm§ZmM `m àjonUmbm CnpñWV amhÊ`mMr nadmZJr XoÊ`mV Ambr. 11 VmaIobm gm`§H$mir nmMÀ`m Xaå`mZ gdmªZm Ww§~m B{¹$Q>mo[a`b am°Ho$Q> bm±qMJ ñQ>oeZÀ`m (Q>b©g) AmdmamV àdoe XoÊ`mV Ambm. Q>ßß`mQ>ßß`mda AgUmè`m MoH$s¨J nmoñQ> nma H$ê$Z Q>b©gMr ~g Aa~r g_wÐmÀ`m {H$Zmar AgUmè`m à_moMZ _§M (bm±qMJ n°S>) Ago {b{hboë`m \$bH$mnmer `oD$Z nmoMbr. {VWo g_moaM g_wÐmÀ`m ~mOybm EH$m ñQ>±S>da bmb a§JmMo ì`mo_ AmS>ì`m pñWVrV R>odbobo hmoVo. Ë`mda nm§T>è`m a§JmV Bgamo- ^maV Aer Ajao N>mnbobr hmoVr. àjonUmgmR>r AmUIr Vmg^amMm H$mbmdYr am{hbobm AgVmZm {dÚmÏ`mªMr àjonUmgmR>r eodQ>À`m Q>ßß`mMr V`mar gwê$ hmoVr. àjonU nmhm`bm Amboë`m {Z_§{ÌVm§Zm Q>r_Mo gd© {dÚmWu ì`mo_ `m ñdV: ~Zdboë`m am°Ho$Q>Mr Vm§{ÌH$ _m{hVr XoV hmoVo. \$moQ>mogoeZ Pmë`mda nmM dmOyZ 45 {_{ZQ>m§Zr bm±Mn°S>dê$Z gdmªZm H§$Q´>mobê$_H$S>o hb{dÊ`mV Ambo.
àjonUmbm 30 {_{ZQ>o am{hbr AgVmZm am°Ho$Q> 75 A§em§À`m H$moZmV Aa~r g_wÐmÀ`m {XeoZo Vm|S> H$ê$Z C^o H$aÊ`mV Ambo. _mÌ, Ë`mMdoir {dOm§À`m H$S>H$S>mQ>mgh nmdgmbm gwê$dmV Pmbr. H§$Q´>mob ê$__Ü`o bmdboë`m ñH«$sZda nmdgmV {^OV Agbobo ì`mo_ {d{dY A±Jb_YyZ nmhVm `oV hmoVo. BVa XmoZ ñH«$sZda am°Ho$Q>Mm {Z`mo{OV _mJ© AmboImÀ`m ñdê$nmV XmI{dÊ`mV Ambm hmoVm. am°Ho$Q>Mo CÈ>mU Pmë`mda Q>o{b_oQ´>rÛmao {_iUmè`m _m{hVrÀ`m AmYmao Ë`mM AmboImda Zdm _mJ© C_Q>V OmVmo Am{U Ë`mdê$Z am°Ho$Q>Mo àjonU {H$VnV `eñdr Pmbo ho g_OVo. H$mD§$Q>S>mD$Z nwT>o gaH$V hmoVo, Vgm nmdgmMm Omoahr dmT>bm. àjonUmbm 10 {_{ZQ>m§Mm H$mbmdYr am{hbm AgVmZm EH$mEH$s H$mD§$Q>S>mD$Z Wm§~{dÊ`mV Ambo. Q>r_À`m gd© gXñ`m§À`m Mohè`mda EH$mEH$s Z¡amí` Ambo. Iam~ hdm_mZm_wio EH$m {d_mZmbm OdiM AgUmmè`m {d_mZVimda CVaÊ`mMr nadmZJr ZmH$maÊ`mV Ambr hmoVr. Ë`m_wio Vo {d_mZ àjonUmÀ`m _mJm©VyZM {KaQ>çm KmbV hmoVo. Vo {d_mZ CVaon`ªV ì`mo_Mo àjonU eŠ` ZìhVo.
àjonUmMr gmS>oghmMr doi CbQy>Z Jobr. gw_mao 45 {_{ZQ>m§Zr nwÝhm Cd©arV Xhm {_{ZQ>m§Mo H$mD§$Q> S>mD$Z gwê$ Pmbo, Voìhm nmD$ghr Wm§~bm hmoVm. AmOMo àjonU nmhÊ`mgmR>r ìhrEgEggrMo g§MmbH$ S>m°. draamKdZhr CnpñWV hmoVo. àjonUmbm nmM {_{ZQ>m§Mm H$mbmdYr am{hbm AgVmZm gdmªZr H§$Q´>mobê$_À`m Jƒrda Ymd KoVbr. gdmªÀ`m ZOam gw_mao nmMeo _rQ>a Xya AgUmè`m bm±Mn°S>H$S>o amoIë`m Joë`m. pñnH$ada EoHy$ `oUmè`m H$mD§$Q>S>mD$Z_Ü`o _J {dÚmÏ`mªZrhr Amnbm AmdmO {_gibm. \$mB©ìh.. \$moa.. W«r.. Qy>.. dZ ßbg dZ ßbg Qy>.. A§Ymao bm±qMJ n°S> EH$mEH$s àH$mebo Am{U Amg_§V hmXadUmam AmdmO H$arV ZmatJr a§JmÀ`m Á`moVrgh ì`mo_ H$mhr goH§$XmV T>Jm§À`m n{bH$S>o Jobo. {dÚmÏ`mªZr Q>mù`m- {eQ>çm§gh Amnë`m `emMm AmZ§X gmOam Ho$bm. EH$_oH$m§Zm AmqbJZ XoVmZm AZoH$m§Mo S>moio nmUmdbo.
H§$Q´>mobê$__Yrb ñH«$sZda {Z`mo{OV _mJm©da ì`mo_Mm Iam _mJ© C_Qy> bmJbm. Anojonojm ì`mo_ A{YH$ C§Mmda Joë`mMo bjmV Ambo. Ë`m_wio Ë`mÀ`m g_wÐmV nS>Ê`mMo {R>H$mU WmoS>o AmUIr Xÿa Am{U EHy$U âbmB©Q>Mm H$mbmdYr H$mhr goH§$Xm§Zr dmT>bm. _mÌ, gd© `§ÌUm§Zr Amnbo H$m_ MmoI nma nmS>bo. ì`mo_ g_wÐmV H$mogië`mda H§$Q´>mob ê$__Yrb àmoJ«°_aZr {dÚmÏ`mªÀ`m {ZXe©Zmg AmUyZ {Xbo H$s, Ë`m§Zr V`ma Ho$boë`m nobmoS>Mr _m{hVr Am{U BòmoÀ`m emókm§À`m nobmoS>Mr _m{hVr AJXr V§VmoV§V OwiV Amho. H$moUVmhr AZw^d nmR>rer ZgVmZm {dÚmÏ`mªZr gmÜ` Ho$bobo ho bj IamoIa H$m¡VwH$mñnX Agë`mMo S>m°. draamKdZ `m§Zr `mdoir gm§{JVbo.

JJZ AJ«dmb `m eodQ>À`m dfm©V {eH$V Agboë`m {dÚmÏ`m©Zo `m àH$ënmMo ZoV¥Îd Ho$bo hmoVo. VgoM àIa AJ«dmb `m n{hë`m ~°MÀ`m {dÚmÏ`m©Zo am°Ho$Q>À`m AmaIS>çmMo H$m_ nm{hbo hmoVo. {ZVrZ {_lm hm {dÚmWu gÜ`m Bòmo g°Q>obmB©Q> g|Q>a_Ü`o H$m_ H$arV Amho, Ë`mZo `m am°Ho$Q>À`m àmonëOZMr O~m~Xmar nm{hbr hmoVr. nwÊ`mÀ`m gw{_V Vm§~o `m {dÚmÏ`m©Zo am°Ho$Q>À`m AmamIS>çmV VgoM ì`dñWmnZmV gh^mJ KoVbm hmoVm, Va A{^foH$ nmQ>rb Am{U Am{XË` Mm\$iH$a `m§Zr nobmoS>À`m {Z{_©VrV gh^mJ KoVbm hmoVm. ì`mo_À`m n{hë`mM à`ËZmV Amboë`m `em_wio AmnUhr am°Ho$Q> V`ma H$ê$Z àjo{nV H$ê$ eH$Vmo Agm {dídmg Amë`mMr à{V{H«$`m `m gd© {dÚmÏ`mªZr {Xbr. `m àH$ënm_wio am°Ho$Q> bm±qMJÀ`m g§ñH¥$VrMr AmoiI {dÚmÏ`mªZm Pmbr Agë`mMo Am`Am`EgQ>rMo g§MmbH$ S>m°. Eg. Ho$. XmgJwám `m§Zr gm§{JVbo. VgoM AmVm Xadfu Am`Am`EgQ>rMo {dÚmWu EH$ am°Ho$Q> bm±M H$aVrb Agohr Ë`m§Zr Omhra Ho$bo.

^maVr` AdH$me H$m`©H«$_mMm Zdm AÜ`m`:
ì`mo_ ho AmH$mamZo 2.31 _rQ>a C§MrMo Agbo Am{U Ë`mZo dmVmdaUmV \$º$ 16 {H$bmo_rQ>aMmM Q>ßnm JmR>bm Agbm, Var `m CÈ>mUmMo XoemÀ`m AdH$me H$m`©H«$_mÀ`m Ñï>rZo _hÎd _moR>o Amho. BòmoÀ`m g§ñWm§VJ©V AgUmao am°Ho$Q> V§ÌkmZ `m CÈ>mUm_wio {dÚmÏ`mªn`ªV Am{U Zì`m {nT>rn`ªV nmoMbo Amho. XoemÀ`m {d{dY {dÚmnrR>m§_Yrb {dÚmÏ`mªZr V`ma Ho$bobo AZoH$ CnJ«h AdH$memV nmR>dÊ`mV Ambo AmhoV. _mÌ, {dÚmÏ`mªZr V`ma Ho$boë`m am°Ho$Q>À`m àjonUmMo _hÎd Ë`mnojm {H$Ë`oH$ nQ>tZo A{YH$ Amho. Xoembm emókm§Mr H$_VaVm ^mgV AgVmZm {derVë`m Vê$Um§Zr Ë`m§À`mH$S>rb _moOŠ`m AZw^dm§À`m Omoamda _mabobr hr _Ob BòmoÀ`m ^{dî`mÀ`m Ñï>rZo _moR>r AídmgH$ Amho. VgoM `m am°Ho$Q>À`m {Z{_©Vr_Ü`ohr {dÚmÏ`mªZr H$m°nr Z H$aVm ñdV§ÌnUo {Z{_©Vr H$aÊ`mMm {ZdS>bobm _mJ©hr H$m¡VwH$mñnX åhUm`bm hdm.
1967 gmbr `mM Ww§~mÀ`m ZmaimÀ`m PmS>m§Imbr ~gyZ S>m°. E. nr. Oo. AãXþb H$bm_ Am{U Ë`m§À`m Vê$U ghH$mè`m§Zr amo{hUr gmD§$S>tJ am°Ho$Q>Mr OmoS>Ur Ho$br hmoVr. Ë`mM amo{hUr gmD§$S>tJ am°Ho$Q>À`m AZw^dm§VyZ XoemMo _hmH$m` nrEgEbìhr Am{U OrEgEbìhr ho CnJ«h àjonH$ gmH$mabo Jobo Am{U XoemMm AdH$me H$m`©H«$_ {Z_m©U Pmbm. Ë`mM AmdmamV 45 dfmªZ§Va Am`Am`EgQ>rÀ`m {dÚmÏ`mªZr N>moQ>çmem ì`mo_Mo `eñdr àjonU H$ê$Z Zì`m AÜ`m`mbm àma§^ Ho$bm Amho.     

Am`Am`EgQ>r: AdH$meemók KS>{dUmao {dÚmnrR>
nmM dfmªnydu ^maVr` AdH$me g§emoYZ g§ñWoZo (Bòmo) Amnë`mbm ^oS>gmdUmar emók Am{U A{^`§Ë`m§Mr H$_VaVm ^ê$Z H$mT>Ê`mgmR>r {Vê$AZ§Vnya_Odi B§{S>`Z BpÝñQ>Q>çyQ> Am°\$ ñnog gm`Ýg A±S> Q>oŠZm°bm°Or `m A{^_V {dÚmnrR>mMr ñWmnZm Ho$br. `m {dÚmnrR>mVyZ {eHy$Z V`ma Pmboë`m àË`oH$mg WoQ> BòmoÀ`m {d{dY g§ñWm§_Ü`o gm_mdyZ KoÊ`mMr ì`dñWm H$aÊ`mV Ambr. ñdV: _mOr amï´>nVr S>m°. E. nr. Oo. AãXþb H$bm_ `m§Zr `m {dÚmnrR>mMo Hw$bnVrnX pñdH$mabo. Á`m§Zr ñdV: ^maVr` AdH$me H$m`©H«$_mMm nm`m aMbm Ë`m§ZrM `m g§ñWoMo ^{dî` C‚db amhmdo `mgmR>r Am`Am`EgQ>rÀ`m ê$nmZo Zdm à`moJ gwê$ Ho$bm. n{hë`m dfunmgyZM Am`Am`EgQ>rbm Xoe^amVyZ _moR>m à{VgmX {_iy bmJbm. Joë`m VrZ- Mma XeH$m§V Bòmo_Ü`o X{jU ^maVr`m§MoM à_mU gdm©{YH$ hmoVo. _mÌ, Am`Am`EgQ>r_wio XoemÀ`m gd© ^mJm§VyZ {dÚmÏ`mªMm BòmoH$S>o AmoK gwê$ Pmbm. Ë`mbm _hmamï´>hr AndmX Zmhr. Xadfu _hmamï´>mVyZhr Mm§Jë`m g§»`oZo {dÚmWu `m g§ñWoV XmIb hmoV AmhoV. gÜ`m nXdr nmVirda (~mamdrZ§Va) `m g§ñWoV ~rQ>oH$ EpìhAmo{ZŠg, ~rQ>oH$ EAamoñnog Am{U ~rQ>oH$ {\${OH$b gm`Ýgog ho H$mog© KoÊ`mV `oVmV. Ë`mnwT>ohr nXì`wÎma {ejU Am{U nrEMS>r H$aÊ`mMr gw{dYm Am`Am`EgQ>r_Ü`o Amho.

H$m` Amho gmD§$S>tJ am°Ho$Q>?


gmD§$S>tJ am°Ho$Q> ho dmVmdaUmÀ`m R>am{dH$ C§Mrn`ªV CSy> eH$Umao Am{U dmVmdaUmMm Aä`mg H$aUmar emór` CnH$aUo dmhÿZ ZoUmao N>moQ>o am°Ho$Q> AgVo. {dfwdd¥Îmr` Mw§~H$s` PmoV, AdH$memVyZ `oUmao CËgO©Z, AmoPmoZMm Wa, EŠg ao, VgoM hdm_mZmMr ~XbVr pñWVr Aä`mgÊ`mgmR>r `m am°Ho$Q>Mm dmna H$aÊ`mV `oVmo. ^maVmV ñdXoer am°Ho$Q> {Z{_©VrMr na§nam amo{hUr gmD§$S>tJ am°Ho$Q>À`m {Z{_©VrZo Pmbr hmoVr. hr am°Ho$Q> 50 Vo 200 {H$bmo_rQ>a C§Mrn`ªV gw_mao 100 {H$bmo dOZmMr emór` CnH$aUo ZoD$ eH$VmV. _mÌ, CnJ«hmbm n¥Ïdr^modVr {\$aVo H$aÊ`mMr j_Vm gmD§$S>tJ am°Ho$Q>_Ü`o ZgVo.


Q>b©g

Ww§~m B{¹$Q>mo[a`b am°Ho$Q> bm±{M§J ñQ>oeZMr {Z{_©Vr `wZm`Q>oS> ZoeÝgÀ`m ghH$m`m©Zo ^maVmZo 1960 À`m XeH$mV Ho$br. {Vê$AZ§Vnwa_À`m CÎmaobm g_wÐ {H$Zmar AgUmè`m Ww§~m `m Jmdmdê$Z n¥ÏdrMo Mw§~H$s` {dfwdd¥Îm OmVo. Ë`m_wio `m {R>H$mUmbm AdH$meemómÀ`m ÑîQ>rZo _hÎd Amho. 2 \o$~«wdmar 1968 amoOr ho H|$Ð Am§Vaamï´>r` g_wXm`mbm ~hmb H$aÊ`mV Ambo hmoVo. VoìhmnmgyZ `m H|$Ðmdê$Z Xoem-{dXoemVrb 2308 gmD§$S>tJ am°Ho$Q>Mo àjonU H$aÊ`mV Ambo Amho.



(सर्व छायाचित्रे इस्रो आणि आयआयएसटीकडून साभार)

बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

शुक्र- सूर्याचे मिलन

कच्छच्या वाळवंटात प्रवेश केला तेव्हा आमच्याकडच्या तापमापकावर ४५ अंश तापमान दिसत होते. मोठ्या हेअर ड्रायरचा गरम झोत अंगावर घेऊन शरीरातील उरल्या सुरल्या पाण्याची वाफ होत आहे असाच भास होत होता. अशा स्थितीत काही मिनिटेही काढणे शक्य नव्हते, तरी आमच्यापैकी प्रत्येक जण अगदी उत्साहात होता. कारणच असे होते. पृथ्वीवर आज जगत असलेल्यांना दिसू शकणारे शेवटचे शुक्र अधिक्रमण दुसऱ्या दिवशी आम्हाला दिसण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मॉन्सूनने कर्नाटकपर्यंत मजल मारली होती आणि देशाच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान होते. अशा स्थितीत जिथे वर्षातले ३० दिवस ढगाळ हवामान असते अशा कच्छच्या वाळवंटातील धोलाविरा या हडप्पाकालीन नगराची आम्ही निवड केली होती आणि ती योग्यच असल्याचे आकाशाकडे पाहून सिद्ध झाले होते.
टिपिकल कच्छी घरांची रचना असणाऱ्या गेस्ट हाउसच्या आवारात आम्ही पहाटेच टेलीस्कोप, कॅमेरे पूर्वेच्या दिशेने सज्ज केले. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे साडेतीनच्या सुमारास शुक्राच्या काळ्या प्रतिमेचा सूर्यबिम्बावरून प्रवास सुरु झाला होता. आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या भागात सूर्योदयापर्यंत शुक्राचा सूर्यावरील प्रवासाचा मध्य येणार होता. आदल्या दिवशी या भागात धुळीचे वादळ सुरु झाल्यामुळे आकाशाला एक पिवळट छटा मिळाली होती. तेव्हाच या धुळीच्या पडद्यामुळे शुक्राचे अधिक्रमण पाहणे सुखावह होणार असल्याचे जाणवले. संधीप्रकाश जाऊन आता लख्ख उजेड पडला होता. घड्याळातील वेळ या ठिकाणी सूर्योदय झाल्याचे दाखवत होती. मात्र, त्याच धुळीच्या पडद्यामुळे क्षितिजावर सूर्य अजूनही नजरेस पडत नव्हता. सात वाजून ४५ मिनिटे झाली असतील, तेव्हा क्षितिजापासून पाच एक अंशांवर एक हलकीशी सफेद गोलाकार प्रतिमा दिसू लागली.. अगदी मायलर फिल्ममधून दिसेल असा सूर्य आम्ही सध्या डोळ्यांनी पाहत होतो. थोडे निरखून पाहिल्यावर त्यावर तीट लावल्याप्रमाणे शुक्राचा काळा ठिपकाही दिसला. सगळ्यांनी जल्लोष केला. शतकातील शेवटचे शुक्र अधिक्रमण आम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी याची डोळा पाहत होतो..
पृथ्वीवरून शुक्राचा पूर्ण गोलाकार आपण अधिक्रमणाशिवाय कधीच पाहू शकत नाही. शुक्राच्या चांदणीला दुर्बिणीतून पहिले तर कायमच आपल्याला चंद्राच्या कोरीप्रमाणे शुक्राची कोर दिसते. सूर्याभोवतीच्या शुक्राच्या प्रवासात त्याच्या एका बाजूला प्रकाश आणि दुसऱ्या बाजूला सावली असल्यामुळे पृथ्वीवरून शुक्र पूर्ण दिसू शकेल अशी दोनच ठिकाणे असतात. एक.. पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेत सरळ मागे (जी अवस्था सूर्याने शुक्राला झाकल्यामुळे किंवा प्रखर सूर्यप्रकाशामुळे कधीही दिसू शकत नाही) आणि दुसरी पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेवर शुक्र मधोमध येईल तेव्हा.. अगदी सूर्य ग्रहणाप्रमाणे. ही स्थिती जुळून येणे तसे दुर्मिळ असते. शुक्राचे एक अधिक्रमण दिसले, की पुन्हा ते आठ वर्षांनी दिसते. मग १२१ वर्षांनी पुन्हा आठ वर्षांच्या अधिक्रमणाच्या जोड्या त्या नंतर १०५ वर्षांनी आठ वर्षांच्या अधिक्रमानाच्या जोड्या अशा फ्रिक्वेन्सीने ही घटना पृथ्वीवरून दिसत असते. आठ जून २००५ नंतर आठ वर्षांनी या शतकातले शेवटचे अधिक्रमण आम्ही पाहत होतो. या नंतरचे अधिक्रमण २११७ मध्ये होणार असल्यामुळे आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.
आठ ते दहा या वेळेत अधिक्रमणाच्या मध्यापासून शेवटपर्यंतच्या अवस्थांची फोटोग्राफी आणि व्हीडीओग्राफी करून ही दुर्मिळ घटना आम्ही पुढच्या पिढीसाठी कॅमेरात कैद केली. रेंजमध्ये आल्यावर इंटरनेट सुरु केले तेव्हा समजले.. की पावसापासून बचावासाठी ज्या टीम्स ईशान्येकडे किंवा अगदी उत्तरेला लडाखला गेल्या होत्या त्यांनाही ढगाळ हवामानामुळे ही घटना नीटशी पाहता आली नाही. भारताच्या हवामानाचा जो काही थोडाफार अभ्यास केला आहे त्याचा फायदा आम्हाला २००९ चे खग्रास सूर्यग्रहण, २०१० चे कंकणाकृती सूर्यग्रहण आणि आता २०१२ च्या शुक्र अधिक्रमणासाठीही झाला. या शतकात आता पुन्हा ही घटना दिसणार नसल्यामुळे धोलाविराच्या धुळीच्या पडद्यामागे रंगलेला सूर्य- शुक्राच्या मिलनाचा दुर्मिळ फोटो येत्या पिढीला शुक्र अधिक्रमण काय असते हे सांगू शकेल.


प्रोजेक्ट मेघदूत- सिझन २

अल्लाह मेघ दे पानी दे छाया दे रे तू ..रामा मेघ दे.. श्यामा मेघ दे ..
आंखे फाडे दुनिया देखे आज ये तमाशा.. है ये विश्वास मेरे.. है मेरी आशा..
पूर्वोत्तर भागाचा काही अपवाद सोडता देशाच्या काना- कोपऱ्यातून व्यक्त होणारी ही आर्त साद मॉन्सूनच्या कोरड्या वाऱ्यांबरोबर दूर दूर वाहत चालली आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मॉन्सूनचे वारे कित्येक दिवस घोंघावत आहेत . मात्र, त्यांच्या सोबतीला जलधारांचे संगीत नाही आणि कृष्णमेघाचे धीर गंभीर सूरही नाहीत..
२०११ सालचा मॉन्सून गेल्या कित्येक वर्षातला सर्वोत्तम मानला गेला होता. सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडल्यामुळे पुढील वर्षी (म्हणजे २०१२) पावसाला थोडा विलंब झाला तरी चालेल एवढा पाऊस  झाल्याचे मानले जात होते. पावसाच्या आकड्यांनी निर्धास्त होऊन निसर्ग सदा सर्वकाळ एकाच प्रदेशावर मेहेरबान राहत नसतो हे साधे गणित आपण विसरलो. आकाशातून बरसलेली मोफत जलसंपत्ती आपण पुरेशी साठवली नाहीच , पण जी साठवली तिचाही वाट्टेल तसा वापर करून स्वतःची दयनीय अवस्था करून घेतली. हतबल अवस्थेत आकाशाकडे टक लावून बसण्याव्यतिरिक्त आता दुसरा पर्याय नाही. मॉन्सून दरवर्षी आपल्याला त्याचे विविध रंग दाखवत असतो.. गेल्या वर्षीच्या जलरंगानंतर आता काही कोरडे फटकारे!
मॉन्सूनच्या अशाच विविध रंगांचे प्रतिबिंब भारताच्या निसर्गात आणि समाजात त्या त्या वर्षी कसे उमटते हे अभ्यासण्यासाठी २०११ पासून 'प्रोजेक्ट मेघदूत'ला सुरुवात झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणलेल्या जलधारांच्या सोबतीनेच पश्चिम घाटातून पावसाचा पाठलाग करीत प्रोजेक्ट मेघदूतची टीम महाराष्ट्रापर्यंत पोचली. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरून पावसाचे आणि त्या प्रदेशाचे नाते काय हे तपासण्याचाही प्रयत्न केला गेला. कोवलमच्या किनारी पालथ्या होड्यांवर बसून समुद्राकडे एकटक पाहणारा मल्याळी मच्छिमार असो किंवा पावसाळ्यात छत्र्यांचा व्यवसाय करून कोट्यावधी रुपये कमावणारा आलेप्पीचा बिझनेसमन असो..पावसाचे भारतीय जीवनावर किती थेट आणि खोल परिणाम होतात हे प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन १ मध्ये जवळून पाहता आले. त्याचप्रमाणे कोकणातील खारवी मच्छिमार, मेळघाटातला कोरकू आदिवासी, गडचिरोलीचा गोंड आदिवासी, कोल्हापूर जवळचा कुणबी शेतकरी, घाटातला धनगर आशा अनेकांशी संवाद साधून त्यांचे पावसाचे आडाखे आणि पिढीजात त्यांना मिळालेले निसर्ग निरीक्षणाचे ज्ञान समजावून घेतले. मुसळधार पावसात पहिल्या वर्षी दक्षिण भारत अनुभवून झाल्यानंतर यावर्षी प्रोजेक्ट मेघदूत पावसाबरोबर (?) ..खरतर मॉन्सूनबरोबर मध्य भारतातील स्थिती अभ्यासणार आहे. 


मध्य भारताचे मॉन्सूनच्या दृष्टीने महत्वाचे स्थान आहे. या भागात अरबी समुद्राकडून आणि बंगालच्या उपसागाराकडून अशा दोन्ही बाजूंनी येणाऱ्या मॉन्सूनच्या शाखांचा मिलाफ होतो आणि जलधारांचा वर्षाव होतो. सातपुडा, विन्ध्य पर्वतांबरोबर नर्मदेचे खोरे आणि घनदाट पेंच, बांधवगडसारख्या अभयारण्याने समृद्ध निसर्ग लाभलेल्या या प्रदेशाचे भारताच्या दृष्टीने सांस्कृतिक महत्वही तितकेच आहे. भोजपूर, उज्जैन, चित्रकुट, इंदौर, मांडू, विदिशा ही ठिकाणे देशाच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाची साक्ष देतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी कला, संगीत, शिल्प, साहित्य या बरोबरच ज्ञान- विज्ञानाच्या निर्मितीचा कळस या प्रदेशाने अनुभवला आहे. मौर्य, गुप्तांपासून मोघल, राजपूत, मराठा आणि इंग्रजांपर्यंत सर्व शासकांच्या खुणा या भागात घडलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय घटना आजही डोळ्यासमोर उभ्या करतात. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर या प्रदेशातील निसर्गात आणि समाजात काय बदल होतात हे पाहतानाच मॉन्सूनची या भागातील निसर्गाच्या, भूगोलाच्या आणि सामाजिक रचनेच्या जडणघडणीत नेमकी भूमिका काय हे अभ्यासण्याचा प्रयत्न प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ मध्ये करण्यात येणार आहे. मध्य भारतातील पर्वतीय भागात राहणारे आदिवासी, तसेच  नर्मदेच्या खोऱ्यात शेती करणाऱ्या शेतकर्यांकडे मॉन्सूनबद्दल काय ज्ञान आहे तेही तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे.
या वर्षीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाकवी कालिदासाने त्याच्या मेघदूत या काव्यात मेघाला सांगितलेल्या मार्गावरून (मध्य भारतातील) हा प्रवास होणार आहे. या प्रवासात मेघदूतमध्ये उल्लेख केलेल्या विविध स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथून प्रत्यक्ष हवामानाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. त्या ठिकाणावरून मॉन्सूनच्या वाऱ्यांची आणि ढगांची दिशा नेमकी काय आहे, त्याने उल्लेख केलेल्या प्रदेशातील निसर्गात आणि भूगोलात आता काय फरक झालेला आहे हेही तपासण्याचे उद्दिष्ट प्रोजेक्ट मेघदूतच्या सिझन २ साठी ठेवण्यात आले आहे. १९९३ मध्ये पुण्यातील नामवंत डॉक्टर एस. व्ही. भावे यांनी त्यांच्या स्वतःच्या विमानातून मेघदूतच्या मार्गाचा मागोवा घेतला होता. त्यांच्या अनुभवांचा आधार घेऊन त्या मार्गावरील जमिनीवरील स्थिती नेमकी काय आहे हे तपासण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मेघदूत काव्यामधील हवामानशास्त्र तपासले जातानाच त्या काळात हे ज्ञान कसे निर्माण झाले याचेही उत्तर पुढील काळात मिळू शकणार आहे.     
मॉन्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबामुळे प्रोजेक्ट मेघदूतचा मध्य भारतातील प्रवास ३० जून ते १० जुलै या कालावधीत होणार आहे. नागपूरजवळील रामटेकपासून या प्रवासाला सुरवात होणार असून पेंच, पचमढी, भेडाघाट , जबलपूर, चित्रकुट, खजुराहो या मार्गाने पश्चिमेकडे विदिशा, भोपाळ, भीमबेटका, उज्जैन , इंदौर असा दहा दिवसांचा प्रवास राहणार आहे. शेतकरी, आदिवासी, विविध विषयांचे तज्ञ, पत्रकार, साहित्यिक, कलाकार यांच्या मुलाखती घेण्याबरोबर ठिकठिकाणी थांबून तेथील हवामानाच्या नोंदी घेण्याचे काम प्रोजेक्ट मेघदूतची टीम करणार आहे. या सर्व घटनांचे, तसेच निसर्गात आणि समाजात होणाऱ्या बदलांचे नियमितपणे छायाचित्रणही करण्यात येणार आहे. सिझन २ साठी १० जणांची टीम काम करीत असून, यामध्ये पत्रकार, आयटी प्रोफेशनल, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
मॉन्सून म्हणजे फक्त पाऊस नाही हे माहित असूनही हा प्रवास मॉन्सूनच्या पावसाबरोबरच व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. म्हणूनच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कधी तयार होते आणि मॉन्सूनची दमदार प्रगती कधी सुरु होते याकडे आम्हा सर्वांचे लक्ष लागून आहे.

१५ जून २०१२